Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

लग्नानंतर नवरी दागिने घेऊन फरार!

Webdunia
सोमवार, 4 एप्रिल 2022 (13:06 IST)
जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन नवरी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 2 लाख 90 हजारांचे दागिने या नवरीने गायब केले असून या मागे मोठी टोळी असल्याची शक्यता आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नववधूने लग्नाच्या अवघ्या दोन दिवसातच दागिने घेऊन पळून जाण्याची घटना उघडकीस आली.  शेतकरी राजू दौलत काकडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याचा विवाह जमत नसल्याने त्यांनी एका जालना येथील तुकाराम शिंदे यांच्या माध्यमातून हिंगोली शहरातील दिलीप जाधव यांची मुलगी सोनू या तरुणीशी त्यांचा विवाह ठरवला.
 
या लग्नासाठी तुकाराम शिंदे याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर 2 लाख 90 हजार रुपयांवर हा व्यवहार पूर्ण झाला. पैसे दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शेलूद गावातील वाढोना परिसरातील भूयारेश्र्वर मंदिरात वैदिक पद्धतीने दोघांचा लग्न ही झाला. पण, लगनाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अंगावरील दागिन्यांसह कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. या प्रकरणी राजू दौलत काकडेच्या फिर्यादी वरून नववधू आणि 2 मध्यस्थीसह चौघांवर  पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments