Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी

Webdunia
सोमवार, 13 एप्रिल 2020 (13:30 IST)
कोरोनाच्या संकटामुळे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत.
 
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करुन त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. बाबासाहेब हे त्यांच्या विचारांने, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.

डॉ. बाबासाहेबांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून डॉ. बाबासाहेबांची जयंती साजरी करुया. त्यांना अभिवादन करुया. डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व कोरोनाविरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.
 
कोरोनाविरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असेही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या 5 जीवनसत्त्वांच्या कमतरतेमुळे डोकेदुखी होते, जाणून घ्या उपाय

Natural Cool Water उन्हाळ्यात फ्रीज न वापरता थंड पाणी मिळवा, कसे ते जाणून घ्या

झोपेची समस्या दूर करण्यासाठी या योगासनांचा सराव करा

जातक कथा : दयाळू मासा

स्वप्नात हे पक्षी दिसणे खूप शुभ मानले जाते, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: औरंगाबादनंतर नागपूर खंडपीठला मिळाली बॉम्बने उडवून देण्याची धमकी

पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांचा मृत्यू, मुख्यमंत्री फडणवीसांचे विधान समोर आले

Terrorist attack in Pahalgam: पहलगाम दहशतवादी हल्ल्यात महाराष्ट्रातील दोन जणांसह परदेशी नागरिकांचा देखील मृत्यू

औरंगाबादनंतर नागपूर खंडपीठला मिळाली धमकी, मोठा पोलीस बंदोबस्त तैनात

Terrorist attack in Pahalgam: जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू, नाव विचारल्यानंतर गोळीबार

पुढील लेख
Show comments