Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मध्य रेल्वेच्या चाळीसगाव येथे तीन दिवस मेगाब्लॉक, दहा प्रमुख रेल्वे रद्द

Webdunia
शुक्रवार, 12 एप्रिल 2024 (09:58 IST)
चाळीसगाव : मध्य रेल्वेच्या चाळीसगाव येथे तीन दिवस मेगाब्लॉक आयोजित करण्यात आला आहे. 13 एप्रिल ते 16 एप्रिल असा तीन दिवसांच्या मेगाब्लॉकमुळं दहा प्रमुख रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे, उत्तर महाराष्ट्रातील या सर्व ट्रेन आहेत. त्यामुळं प्रवाशांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. चाळीसगाव स्थानकावर यार्ड रिमॉडेलिंगसाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक परिचालित करणार आहे
 
मध्य रेल्वेच्या प्रमुख मार्गावर चाळीसगावला तीन दिवस मेगाब्लॉक असल्याने काही ट्रेन रद्द होणार आहेत. उत्तर महाराष्ट्रातील या सर्व ट्रेन असून मुंबई बडनेरा चाळीसगाव धुळे भुसावळ देवळाली इगतपुरी अशा महत्त्वाच्या स्थानकांशी असलेला प्रवास थांबणार आहे. यामुळे ऐन उन्हाळ्याच्या सुट्टीत रिझर्वेशन केलेल्या कुटुंबीयांची परवड होणार आहे.
 
कोणत्या मेमू रेल्वे बंद राहणार?
११११३ देवलाली- भुसावळ मेमू ही १४ व १५ एप्रिलला रद्द राहील. ११११४ भुसावळ- देवलाली मेमू १४ व १५ एप्रिलला रद्द, १११२० भुसावळ- इगतपुरी मेमू १५ व १६ एप्रिलला रद्द राहील. ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू १६ व १७ एप्रिलला रद्द, ११०११ मुंबई- धुळे एक्स्प्रेस मेमू १४ ते १५ एप्रिलला रद्द राहील. ११०१२ धुळे-मुंबई एक्स्प्रेस मेमू १५ ते १६ एप्रिलला रद्द.
 
०१२११ बडनेरा- नाशिक मेमू १४ ते १६ एप्रिलला रद्द, १२१२ नाशिक- बडनेरा मेमू १४ ते १६ एप्रिलदरम्यान रद्द, ०१३०४ धुळे- चाळीसगाव मेमू १६ एप्रिलला रद्द राहील. मुंबईकडे जाणाऱ्या अनेक गाड्यांचे डायव्हर्शन जळगावहून सुरतमार्गे मुंबई करण्यात आले आहे.

Edited by -Ratnadeep Ranshoor
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments