Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

सप्तशृंगी देवीच्या गडावर येत्या 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान होणार चैत्रोत्सव

Webdunia
शनिवार, 25 मार्च 2023 (21:12 IST)
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्राचे आराध्यदैवत अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंगी देवी आदिमायेच्या गडावर येत्या 30 मार्च ते 6 एप्रिलदरम्यान चैत्रोत्सव होणार आहे. यासाठी न्यासाच्या वतीने विविध पूजा व विधींसाठी तयारी झाली असून, ग्रामपंचायतसुद्धा भाविकांच्या व्यवस्थेसाठी पाणी व स्वच्छतेसाठी नियोजन करीत आहे.
 
दि. 30 मार्च रोजी रामनवमीच्या दिवशी सकाळी साडेसहा वाजता ट्रस्टचे विश्‍वस्त, तहसीलदार, सरपंच, ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत ट्रस्ट कार्यालयापासून मंदिरापर्यंत देवीच्या सुवर्ण अलंकारांची व आभूषणांची मिरवणूक काढण्यात येणार असून, प्रधान जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश हे सकाळी साडेसात वाजता देवीची पंचामृत महापूजा व आरती करणार आहेत. दुपारी 12 वाजता देवी मंदिरात रामनवमीनिमित्त श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
 
चैत्रोत्सवादरम्यान मंदिर 24 तास खुले ठेवण्यात येणार असून यादरम्यान दररोज सकाळ, दुपार, संध्याकाळ व रात्री भगवतीची आरती व पंचामृत महापूजा होणार आहे. दि. 4 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता भगवती शिखरावरील ध्वजपूजन व दुपारी साडेतीन वाजता पारंपरिक देवीभक्त गवळी पाटील यांच्या उपस्थितीत ध्वज मिरवणूक व रात्री बाराच्या सुमारास सप्तशृंग शिखरावर ध्वजारोहण करण्यात येणार आहे. तर दि. 5 एप्रिल रोजी सकाळी 7 वाजता भगवतीची पक्षालय पंचामृत महापूजा करून सकाळी 11 ते 5 या वेळेत भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
वर्षातून दोन वेळा यात्रा भरणार्‍या सप्तशृंगी देवीच्या गडावर चैत्र उत्सवाला अनन्यसाधारण महत्त्व असते. या दरम्यान खान्देशातील 15 ते 20 लाख भाविक गडावर देवीच्या दर्शनासाठी पायी हजेरी लावतात. असा हा उत्सव 30 मार्चपासून 6 एप्रिलपर्यंत साजरा होणार आहे.
 
यात्रेदरम्यानच्या तयारीसाठी तहसीलदार बंडू कापसे यांच्या अध्यक्षतेखाली गेल्या आठवड्यात नियोजन बैठक घेण्यात येऊन यात्रेसंबंधित महत्त्वाच्या विभागांना यात्रा तयारीसाठी सूचना देऊन जबाबदारी देण्यात आल्या आहेत. व येत्या शुक्रवार ते सोमवारदरम्यान जिल्हाधिकारी गडावर आढावा बैठक घेऊन विभागवार तयारीचा आढावा घेणार आहेत.
 
ग्रामपंचायतीच्या वतीने हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा – ग्रामपंचायत प्रशासनाने गडावरील हॉटेल व्यावसायिकांना शुद्ध पाणी वापरण्यासाठी सूचना दिल्या आहेत. यामध्ये हॉटेलमध्ये अशुद्ध पाणी आढळून आल्यास कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. टँकरच्या साह्याने अशुद्ध पाणी वापरून पाण्याचेही पैसे घेणार्‍या हॉटेलचालकांचे यामुळे धाबे दणाणले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments