Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यायाधीशांनी घेतला ‘हा’ निर्णय

Webdunia
शनिवार, 27 मार्च 2021 (08:43 IST)
सध्या राज्यभरात कोरोनाचे रूग्ण प्रचंड वेगाने वाढत आहेत. जिल्ह्यात देखील कोरोनाबाधितांची संख्या चांगलिच वाढलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अहमदनगर व संगमनेर येथील सत्र न्यायालयाच्या वेळेत बदल करण्यात आला आहे. दिवसातून दोन सत्रांमध्ये कामकाज चालेल. असा आदेश प्रधान जिल्हा न्यायाधीश श्रीकांत अणेकर यांनी काढला आहे. पहिल्या सत्राचे कामकाज सकाळी साडेदहा ते दुपारी एक यावेळेत तर दुपारच्या सत्राचे कामकाज दुपारी दीड ते सायंकाळी चार यावेळेत चालणार आहे. दि.२६ मार्च ते ९ एप्रिलपर्यंत अथवा पुढील आदेशापर्यंत हा बदल असणार आहे. वकील, पक्षकार अथवा साक्षीदार गैरहजर असले, तरी न्यायाधीशांनी प्रतिकूल आदेश करु नयेत.
 
जे वकील, पक्षकार, साक्षीदार अथवा आरोपी यांची न्यायालयासमोर उपस्थिती आवश्यक आहे, त्यांनाच न्यायालयाच्या आवारात प्रदेश दिला जाणार आहे. असेही आदेशात म्हटले आहे.या पार्श्वभूमीवर कोरोना प्रतिबंधात्मक असलेले सर्व नियम पाळण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: पिंपरी-चिंचवडमध्ये ३१ मे पर्यंत २९ बेकायदेशीर बंगले पाडले जातील

Operation Sindoor भाजपच्या तिरंगा यात्रेवर उद्धव ठाकरेंची शिवसेना युबीटी संतापली, म्हणाली- पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला पूर्ण झालेला नाही

मुंबईत तिरंगा यात्रा सुरू; फडणवीसांनी घोषणा दिली- ऐक बेटा पाकिस्तान, तुझा बाप हिंदुस्थान

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

पुढील लेख
Show comments