Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी औरंगजेबाच्या कबर बाबत मोठे विधान केले म्हणाले-

Devendra Fadnavis
, रविवार, 9 मार्च 2025 (16:29 IST)
सपा आमदार अबू आझमी यांनी औरंगजेबावर दिलेल्या विधानामुळे राजकीय गोंधळ सुरु आहे. अबू आझमी यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर मध्ये असलेल्या औरंगजेबाची कबर हटवण्याची मागणी तीव्र केली जात आहे.
दोन दिवसांपूर्वी हिंदू जनजागृती समितीने माहिती अधिकाराद्वारे माहिती मागितली होती, ज्यामध्ये 2011 ते 2023पर्यंत औरंगजेबाच्या थडग्याच्या देखभालीवर 6.5 लाख रुपये खर्च झाल्याचे उघड झाले.हिंदू जनजागृती समिती आणि इतर संघटनांनी या प्रकरणावर सरकारकडून स्पष्टीकरण मागितले आहे आणि कबर हटवण्याची मागणी केली आहे. 
 
यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, औरंगजेबची कबर हटवावी का हा फक्त त्यांच्या सरकारचा प्रश्न नाही तर सर्व जनतेचा प्रश्न आहे.
वृत्तसंस्था पीटीआयनुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, औरंगजेबाची ही कबर काँग्रेस सरकारच्या काळात जतन करण्यात आली होती. हे थडगे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) अंतर्गत आहे. म्हणून, ते काढून टाकण्यासाठी किंवा कोणतेही बदल करण्यासाठी कायद्याचे पालन करणे आवश्यक असेल. त्यांनी सांगितले की, या संदर्भात घाईघाईने कोणताही निर्णय घेता येणार नाही.
श्री गुरु तेग बहादूर जी महाराज' यांच्या 350 व्या शहीद वर्षाच्या निमित्ताने मुंबईत आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी हे विधान केले. राज्यात औरंगजेबाच्या थडग्यावरील वाद वाढत असताना आणि अनेक राजकीय आणि धार्मिक संघटनांनी ते हटवण्याची मागणी केली असताना हे विधान आले आहे.
Edited By - Priya Dixit 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

नवी मुंबईतील एका हॉटेलमध्ये पार्टी करणाऱ्या महिलांना मंचुरियनमध्ये उंदीर आढळला