Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुख्यमंत्री उद्धव ठाकरें म्हणाले, आमदारांना मी मुख्यमंत्री हवा नसेल तर राजीनामा देतो,पण ...

uddhav thakrey
, बुधवार, 22 जून 2022 (18:11 IST)
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आताच्या घडामोडींवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी आपल्या आमदारांना मी मुख्यमंत्री हवा नसेल तर राजीनामा देतो, असं थेट सांगितलं आहे. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या हिंदुत्वावर देखील भाष्य केलं.
 
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील जनतेला संबोधित करत आहेत. फेसबुक लाईव्हवर उद्धव ठाकरे म्हणाले की, माझा चेहरा पडला आहे असे लोक विश्लेषण करत आहेत. हे कोरोनामुळे आहे आणि दुसरे काही नाही. खूप दिवसांनी तुमच्या समोर आलोय, खूप काही सांगण्यासारखे आहे. मला प्रशासनाचा अनुभव नव्हता. कोरोनासारखे आव्हान समोर आले, कोरोनाला कसे टाळायचे, हे सांगण्यात आले. त्यावेळी जे सर्वेक्षण करण्यात आले होते, त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव पहिल्या १० मुख्यमंत्र्यांमध्ये समाविष्ट होते. 
 
ते म्हणाले की, गेल्या तीन-चार महिन्यांपासून कोणाला भेटणे शक्य नव्हते आणि मी अलीकडेच लोकांना भेटायला सुरुवात केली आहे. सेना आणि हिंदुत्व नेहमीच अबाधित आहे. शिवसेना हिंदुत्वापासून वेगळी होऊ शकत नाही आणि हिंदुत्व शिवसेनेपासून वेगळे होऊ शकत नाही. 
 
मुख्यमंत्री का भेटत नाहीत? कारण माझ्यावर शस्त्रक्रिया झाली होती.त्यानंतरची दोन-तीन महिने हे फार विचित्र होते. मी कुणाला भेटू शकत नव्हते. म्हणून त्या काळात मुख्यमंत्री भेटू शकत नाही ते बरोबर होते. मी माझी पहिली कॅबिनेट मिटिंह ही रुग्णालयातून अटेन्ड केली होती.
 
ते म्हणाले की, मी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यायला तयार आहे, पण तुम्ही माझ्यासमोर येऊन सर्व काही सांगता. एकनाथला सुरतला जाऊन बोलायची काय गरज होती. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना नाही, असे काही लोक म्हणत आहेत. 2014 मध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यानंतर आम्ही एकटेच लढलो. मी गेली अडीच वर्षे मुख्यमंत्री आहे आणि निवडून आलेले सर्व नेते हे बाळ ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाचे आहेत. 
 
एमएलसी निवडणुकीनंतर मी विचारले आणि आमचे आमदार कुठे आहेत ते पाहिले. मी नेहमीच माझी जबाबदारी पार पाडली आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे, मी माझ्या राजीनाम्याचं पत्र तयार करुन ठेवलंय. समोरासमोर येऊन बोला. मी राजीनामा देईन, असा मेसेज मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांना दिला आहे.पण माझ्यानंतर एखादा शिवसैनिक मुख्यमंत्री झाला तरच मला आनंद होईल.
 
"मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे, पण पद सोडल्यानंतर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर मला मान्य आहे," असं म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिक आणि बंडखोर आमदारांना भावनिक साद घातली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

उद्धव ठाकरे LIVE : 'मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा जनतेशी संवाद ,शिवसेना आणि हिंदुत्त्व हे जोडलेले शब्द आहेत'