Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चिपळूण :मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील वाहतूक सुरूच अहवालानंतरच बंदचा निर्णय

Webdunia
मंगळवार, 28 मार्च 2023 (08:08 IST)
मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील चौपदरीकरणात अंतिम टप्प्यातील खोदकामासाठी आठडाभर घाट बंद ठेवण्याची परवानगी महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांकडे मागवली आहे. त्यानुसार प्रांत, पोलीस अणि परिवहन खात्याकडे मागवलेला अहवाल प्राप्त झाल्यानंतरा घाट बंदचा निर्णय घेतला जाणार आहे. दरम्यान, व्हायरल पत्रामुळे गोंधळ उडाला असला तरी सध्यस्थितीत घाटातील वाहतूक सुरळीतपणे सुरू आहे. घाटात काम करताना घाटातील दगड अथवा डोंगरावरील विखुरलेली माती खाली महामार्गावर येऊन अपघात होण्याची शक्यता असल्याने हा घाट वाहतूकीसाठी 27 मार्च ते 3 एप्रिल कालावधीत बंद ठेवून या कालावधीत हलक्या वाहनांची वाहतूक चिरणी आंबडस चिपळूण या पर्यायी मार्गे वळवणेबाबत विनंती केली आहे.
 
दरम्यान, या प्रकरणी वस्तुस्थितीची पहाणी करुन अहवाल सादर करण्याचे पत्र अप्पर जिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक, प्रांताधिकारी चिपळूण तसेच उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रत्नागिरी यांना दिले होते. मात्र हे पत्र व्हायरल झाल्यानंतर गोंधळ उडाला. दरम्यान, सोमवारी घाटातील वाहतूक सुरळीत सुरू होती.

Edited By - Ratnadeep ranshoor 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: सोलापूर येथील कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू

रत्नागिरीत भीषण अपघात, कार नदीत कोसळल्याने ५ जणांचा मृत्यू

साई सुदर्शन आणि शुभमन गिल यांनी मिळून इतिहास रचला, आणखी एक मेगा रेकॉर्ड लक्ष्यावर असेल

तिबेट, बंगालचा उपसागर आणि म्यानमारमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले

सोलापूर : कारखान्याला लागलेल्या भीषण आगीत ८ जणांचा मृत्यू, केंद्र आणि राज्य सरकारने नुकसानभरपाई जाहीर केली

पुढील लेख
Show comments