महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून सिल्लोडच्या केळगावातून धक्कादायक बातमी आली आहे. प्रेमकथेचे रहस्य उलगडू नये म्हणून पोलीस भरतीचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले.कोचिंगच्या संचालकासह चौघांना अटक केली आहे.
कोचिंगच्या संचालकाचे प्रशिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनींशी प्रेमसंबंध होते हे प्रेमप्रकरण लपविण्यासाठी कोचिंगच्या संचालकांनी तीन विद्यार्थ्यांसह एका विद्यार्थ्यांचे अपहरण केले.
अपहृत विद्यार्थ्यांचे नाव अमोल गजानन मख असे आहे.
खरं तर संचालक आणि विद्यार्थिनीच्या नात्याची सुरुवात अमोलनेच केली होती. एवढेच नाही.तर अमोलकडे या प्रेमकथेशी संबंधित काही इतर पुरावे देखील होते. प्रेम प्रकरणाची माहिती कोणाला कळू नये म्हणून संचालकानेच विद्यार्थ्यांचे अपहरण केले. त्याने आपल्या काही साथीदारांसह दुचाकीवर केळगावात पाठवले आणि अमोलला घाटात बोलावून आणि अमोलला लाठ्या आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली.
या घटनेननंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत चार आरोपींना अटक केली आहे. न्यायालयाने चौघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मारहाणी नंतर त्यांनी अमोलला पुरावे परत करण्याची मागणी केली. अमोलने नकार दिल्यावर त्याला बळजबरी कार मध्ये बसवून त्याचे अपहरण करून सिल्लोडला नेत असताना अमोलच्या ओळखीच्या व्यक्तीने बघितले आणि पोलिसांना माहिती दिली.
सिल्लोड ग्रामीण पोलिसांनी भराडीजवळ सापळा रचून चारही आरोपीना पकडले आणि अमोलची सुटका केली. चारही आरोपींना पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे