Dharma Sangrah

महाराष्ट्र मध्ये वोटिंगच्या नावाखाली अनेक ठिकाणी गोंधळ

Webdunia
गुरूवार, 15 जानेवारी 2026 (17:41 IST)
आज १५ जानेवारी २०२६ रोजी महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांसाठी मतदान होत असताना, राज्यभरातून अनेक ठिकाणी गोंधळ आणि तांत्रिक अडचणींच्या बातम्या समोर येत आहे. तसेच मुंबई आणि पुण्यासह अनेक ठिकाणी मतदारांनी तक्रार केली आहे की, मतदानानंतर बोटाला लावली जाणारी 'शाई'  सहज पुसली जात आहे. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत निवडणूक आयोगाच्या पारदर्शकतेवर टीका केली आहे.  
ALSO READ: राज ठाकरे यांनी पराभव स्वीकारला आहे का? आशिष शेलार यांनी पीएयू वादावर जोरदार हल्लाबोल केला
तसेच राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते अंकुश काकडे यांनी आरोप केला की, काही मशिन्समध्ये तीन मतदानानंतर चौथ्या वेळी लाईट लागला नाही. तसेच, मशिन्सची वेळ १४ मिनिटे पुढे असल्याचाही दावा त्यांनी केला. तर नाशिकच्या प्रभाग २४ आणि २९ मध्ये, तसेच सोलापूरच्या आयटीआय कॉलेज केंद्रावर ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मतदान अर्धा ते एक तास उशिरा सुरू झाले.
 
तसेच अहिल्यानगर  प्रभाग ३ मध्ये बोगस मतदार पकडल्याच्या कारणावरून पोलीस आणि शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांमध्ये मोठी खडाजंगी झाली.
 
मालेगावमध्ये प्रभाग ९ मध्ये एका महिलेचे मत तिच्या आधीच कोणीतरी दिल्याचे समोर आल्याने तिथे मोठा गोंधळ उडाला.तसेच शिरवणे येथील एका मतदान केंद्रात कोब्रा साप शिरल्याने मतदारांची पळापळ झाली. सर्पमित्राने सापाला पकडल्यानंतर काही काळाने मतदान पुन्हा सुरू झाले.
ALSO READ: वर्धा येथील लाडकी बहीण योजना संकटात, पोर्टलच्या समस्यांमुळे लाभार्थ्यांना त्रास
तसेच निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे की, जिथे तांत्रिक बिघाड झाला तिथे मशिन्स बदलून देण्यात आल्या आहे आणि तक्रारींची दखल घेतली जात आहे.
ALSO READ: मनपा निवडणूक राज्यभरात जोरात
Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

LIVE: फडणवीसांच्या इशाऱ्यानंतर बिश्नोई टोळीकडून भाजप नेत्याला धमकी

नाशिकमध्ये मोठी दुर्घटना; जीर्ण भिंत कोसळून २ वर्षांच्या मुलाचा मृत्यू

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी अॅक्सिस बँकेतून राजीनामा दिला, त्यांचा २३ वर्षांचा प्रवास उलगडला

धुळे जिल्ह्यात लग्न समारंभात रक्तरंजित हाणामारी, तीन जणांचा मृत्यू

क्रिकेट सामन्यादरम्यान अचानक झालेल्या मधमाशांच्या हल्ल्यात पंचांचा मृत्यू तर अनेक खेळाडू जखमी

पुढील लेख
Show comments