Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पालकांना दिलासा, शिक्षण संस्थांची मागणी फेटाळली

Webdunia
सोमवार, 1 मार्च 2021 (21:52 IST)
राज्यातील शिक्षण संस्थांनी फी वाढ करू नये, याबाबत राज्य सरकारने परिपत्रक काढलं होतं. हे परिपत्रक रद्द करावं, या मागणीसाठी शिक्षण संस्थांनी मुंबई हायकोर्टात याचिका केली होती. मात्र, मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारचं परिपत्रक कायम करत शिक्षण संस्थांची मागणी फेटाळून लावलीय. 
 
राज्य सरकारने 8 मे 2020 रोजी परिपत्रक काढून शिक्षण संस्थांना अतिरिक्त शुल्क घेण्यास तसंच शुल्क वाढीस मज्जाव करणारं परिपत्रक काढलं होतं. या परिपत्रकाविरोधात शिक्षण संस्थांनी हायकोर्टात याचिका केली होती. यावेळी कोर्टाने ही राज्य सरकारच्या परिपत्रकाला तात्पुरती स्थगिती दिली होती.
 
शिक्षण संस्थांच्या याचिकेवर अनेक सुनावण्या झाल्या. यावेळी पालकांच्या वतीने ऍड.अरविंद तिवारी, ऍड. अटलबिहारी दुबे यांनी इंटर्व्हेन्शन याचिका दाखल केली होती. पालकांच्या वतीने ऍड. तिवारी यांनी बाजू मांडली आणि आज या प्रकरणात हायकोर्टाने निकाल दिला. कोर्टाने राज्य सरकारला अनुकूल असा निकाल दिला आहे. त्यामुळे राज्यभरातील पालकांना दिलासा मिळाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुण्यात मध्यरात्री घरात घुसून कुटुंबियांना समोर निर्घृण खून, आरोपी पसार

सुभानिया मशिदीच्या 'बेकायदेशीर' ताब्यावरुन भाजप नेत्याची बीएमसीलाच धमकी

धारावी मशिदीचा वाद काय जाणून घ्या

वन नेशन वन इलेक्शन वर आदित्य ठाकरेंनी केंद्रावर निशाणा साधला

पुढील लेख
Show comments