Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Dapoli : एकाच कुटुंबातील चौघं गायब, दापोलीतील घटना

Webdunia
रविवार, 9 जुलै 2023 (15:41 IST)
रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील विसापूर गावात एकाच कुटुंबातील चार जण बेपत्ता झाल्याची मोठी घटना घडली आहे.या कुटुंबातील बेपत्ता सदस्यांमध्ये दोन लहान मुलांचा समावेश आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
2 जुलै रोजी विसापूर गावातील पाथरी कोंड येथे राहत्या घरातून भरत भेलेकर दुपारच्या सुमारास बेपत्ता झाले. भरत भेलेकर 2 जुलै रोजी दुपारी आपल्या चुलत भाऊ सहदेव दत्ताराम भेलेकर याच्या सह मंडणगड मधील कुंबळे या ठिकाणी गेला होता. लाकडी पट्टी आणायला जात असल्याचे सांगून तो घरातून निघाला आणि परत आलाच नाही.   नंतर 3 जुलै रोजी त्यांची पत्नी सुगंधा या सकाळी मुलांना शाळेत सोडायला जाण्याचे सांगून गेल्या आणि परतल्या नाही. त्यांच्या सोबत त्यांचे मुलं आराध्य आणि श्री हे देखील बेपत्ता झाले आहे.नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला मात्र त्यांना शोध लागला नाही. अखेर कुटुंब बेपत्ता होण्याची तक्रार पोलिसात देण्यात आली.   
 
मिळालेल्या माहितीनुसार, भरत यांना घरातून पळून जाण्याची सवय आहे. ते काही दिवसांपूर्वी देखील बेपत्ता झाले होते. मात्र आता त्यांची पत्नी आणि दोघे मुले देखील बेपत्ता झाल्याने नातेवाईक काळजीत असून त्यांचा शोध सुरु आहे. अक्ख कुटुंब बेपत्ता झाल्यामुळे पोलिसांना याची माहिती देण्यात आली असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. 
 
 
 
Edited by - Priya Dixit 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments