Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पुणे, नाशिकच्या सुरक्षिततेसाठी नगर जिल्ह्यात लाॅकडाउनचा निर्णय

Webdunia
सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (16:37 IST)
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अहमदनगर  जिल्ह्यातील 61 गावांवर लावण्यात आलेल्या निर्बंधावरुन प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याने नगर जिल्ह्यातील 61 गावात निर्बंध लावण्यात आले आहेत. पुणे आणि नाशिक जिल्ह्याला फटका बसू नये यासाठी आत्ताच नगर जिल्ह्यातील 2 तालुक्यातील रुग्ण संख्या राेखण्यासाठी निर्णय घेतला आहेअसं अजित पवार  म्हणाले आहेत.
 
अजित पवार हे सातारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. आज त्यांनी सातारा जिल्ह्याची आढावा बैठक घेतली. यानंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना अजित पवार  म्हणाले की, नगर जिल्ह्यातील 61 गावांत लॉकडाउन करण्यात आलाय. याविषयी अजित पवार यांनी पारनेर आणि संगमनेर तालुक्यात कोरोना बाधितांत वाढ झाल्याने निर्णय घेतला असल्याचं म्हटले. तर, पुणे आणि नाशिक जिल्हा या 2 तालुक्यांना लागून आहे. त्यामुळे ही रुग्णसंख्या रोखली पाहिजे नाहीतर याचा फटका पुणे आणि नाशिकला बसू शकतो. असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
 
पुढे अजित पवार म्हणाले, 12 ते 18 वर्षाच्या मुलांचे लसीकरण करावे अशी चर्चा आहे.अद्याप केंद्राकडून कोणताही निर्णय झालेला नाही. केंद्राचा निर्णय झाल्यावर लसीकरण सुरू केले जाईल.परंतु मुलांना शाळेत पाठवायचे की नाही हा सर्वस्वी निर्णय पालकांचा असून अद्याप मुलांना शाळेत पाठवण्याची पालकांची मानसिकता दिसत नसल्याचंही ते म्हणाले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

वंचित बहुजन आघाडीची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली यादी जाहीर, ट्रान्सजेंडर उमेदवारचा समावेश

अतिशी ने दिल्लीच्या नववे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

तरुणांना सरकार दरमहा 1000 रुपये देणार, कोणत्य राज्यातील काय आहे योजना, कसा मिळणार लाभ?

नेहमी आपल्या बॅगेत कंडोम ठेवायची ! या महिला गव्हर्नरचे 58 कर्मचाऱ्यांशी संबंध होते

धारावीतील बेकायदा मशिदीचे बांधकाम हटवण्यासाठी गेलेले बीएमसीचे पथक परतले, मुदत वाढवली

पुढील लेख
Show comments