Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

चारधाम यात्रेवर निघालेल्या गाडीचा भीषण अपघात,दोघे जागीच ठार

Webdunia
सोमवार, 30 मे 2022 (13:40 IST)
गंगोत्रीच्या महामार्गावर कोपांगजवळ प्रवाशांनी भरलेल्या कारचा भीषण अपघात झाला  आहे. या कार मध्ये चालकासह एकूण 15 जण होते. त्यापैकी दोघे जागीच ठार झाले आहे. 
 
महाराष्ट्राच्या औरंगाबाद येथून एका  टेम्पो ट्रॅव्हल ने 15 जण चारधाम यात्रेसाठी निघाले होते. रविवारी रात्री 12:30 च्या सुमारास गाडी गंगोत्री धाम मधून निघून हरसीलच्या दिशेने जात असता गंगोत्रीपासून 15 किमीच्या अंतरावर असलेल्या कोपांग आयटीबीपी कॅम्प जवळ चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि वाहन अनियंत्रित होऊन 100  मीटर खोल दरीत कोसळले. या अपघातात अलका बोटे आणि माधवन राहणार औरंगाबाद यांचा जागीच मृत्यू झाला तर उमा पाटील, अरनभ महर्षि, साक्षी सिंधे, अर्चना सिंधे, अनया महाजन, अनुप्रिया महर्षि, सई पवार, सुभाष सिंह राणा(रा. मानपूर), डॉ. वेंकेटेश, वर्षिता पाटील, आमरा एकबोटे, रजनीश सेठी व जितेंद्र सिंह(रा.देहरादून) जखमी झाले आहेत.
 
अपघाताची माहिती मिळतातच कोपांग मध्ये तैनात 35 व्या आयटीबीपीने तातडीने बचावकार्य सुरु केले. जखमींना हरसीलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी झालेल्या प्रवाशांपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. 
 
 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments