Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपाल यांचा दौरा, तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री अनुपस्थित राहणार

Webdunia
गुरूवार, 5 ऑगस्ट 2021 (09:55 IST)
राज्य मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचा पूर्वनियोजित मराठवाड्याचा तीन दिवसांचा दौरा आजपासून सुरू होत आहे. या दौऱ्यात तिन्ही जिल्ह्यांमध्ये सरकारी अधिकाऱ्यांबरोबर बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. तर तिन्ही जिल्ह्यांचे पालकमंत्री या वेळी उपस्थित राहणार नाहीत.
 
राज्यपाल कोश्यारी हे गुरुवारपासून तीन दिवस नांदेड, परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या तिन्ही जिल्ह्यांमध्ये शासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत  आढावा घेणार आहेत. यालाच मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेण्यात आला. याबाबत मंत्रिमंडळाची नापसंती राज्यपालांना कळविण्यात आली. करोना, पूर परिस्थिती आदी सर्व महत्वाचे विषय राज्य सरकार योग्यपणे हाताळत असताना राज्यपाल बैठका का घेत आहेत, असा सवाल अल्पसंख्याक विकासमंत्री नवाब मलिक यांनी घेतला होता. दोन सत्ता केंद्रे निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आक्षेपही मंत्रिमंडळाने घेतला होता. मंत्रिमंडळाच्या आक्षेपानंतरही राज्यपालांचा दौरा पूर्वनियोजित कार्यक्र मानुसारच होईल, असे राजभवनच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
 
राज्यपाल किं वा मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या वेळी संबंधित जिल्ह्याच्या पालकमंत्र्याने उपस्थित राहणे हे संके त असतात. वर्धा जिल्हा दौऱ्याच्या वेळी पालकमंत्री रणजित कांबळे अनुपस्थित राहिल्याने तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी कांबळे यांचे पालकमंत्रीपदावरून तात्काळ  हकालपट्टी के ली होती. मात्र, राज्यपाल कोश्यारी यांच्या दौऱ्याच्या वेळी नांदेडचे पालकमंत्री अशोक चव्हाण व परभणीचे पालकमंत्री नवाब मलिक हे उपस्थित राहणार नाहीत. तर हिंगोलीतही पालकमंत्री उपस्थित राहणार नसल्याचे समजते. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावरील आक्षेपार्ह वक्तव्यावर मंत्री विजय शाह यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

महाराष्ट्र सरकारने शाळांना मार्गदर्शक तत्त्वे जारी केली,बाल सुरक्षा आणि जागरूकतेवर भर दिले

एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भाईंदरपाडा उड्डाणपुलाचे उद्घाटन

अनिल देशमुख यांनी बनावट शिक्षक भरतीवरून सरकारवर हल्लाबोल केला

अमित शहांनी फोडली शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस! संजय राऊत यांची पुन्हा अमित शहांवर टीका

पुढील लेख
Show comments