suvichar

मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांचे प्रशासनाला आदेश, दुष्काळ पाहणीसाठी सचिवांनो आपल्या जिल्ह्याचा दौरा करा

Webdunia
सोमवार, 13 मे 2019 (09:44 IST)
राज्यात दुष्काळ निवारणासाठी देण्यात आलेल्या निर्देशांची अंमलबजावणी आणि टंचाई आराखड्याच्या नियोजनाची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्याचे दौरे करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. याबाबतचे अहवाल येत्या २१ मे पर्यंत सादर करण्याचे आदेशही पालक सचिवांना देण्यात आले आहेत.
 
राज्यातील यंदाची दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन त्याचे निवारण करण्यासाठी शासनाने वेगवेगळ्या उपाययोजना केल्या आहेत. दुष्काळी कामांचे नियोजन, मदतीची आवश्यकता, कामांची अंमलबजावणी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जिल्‍हानिहाय बैठका घेऊन प्रशासकीय यंत्रणा व पदाधिकारी यांना आवश्यक त्या सूचना देत आहेत.
 
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सुचनांची अंमलबजावणी व टंचाई आराखड्याचे नियोजन यांची तपासणी करण्यासाठी सर्व पालक सचिवांनी आपआपल्या जिल्ह्यात भेट देऊन तपशीलवार आढावा घ्यावा, त्याचा सविस्तर अहवाल मुख्य सचिवांमार्फत २१ मे २०१९ पर्यंत सादर करावा, असे मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशात नमूद केले आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Hanuman Chalisa Path Benefits हनुमान चालीसा पठणाचे फायदे: मानसिक शक्ती दुप्पट कशी वाढते?

बुध ग्रहाची वक्री चाल सुरू! २९ जूनपासून 'या' राशींचे भाग्य उजळणार, तर कोणाला राहावे लागेल सावध?

Belly fat yoga: पोटावरील चरबी कमी करण्यासाठी 5 उत्तम योगासने, यापैकी कोणतेही एक करून पहा

खूप थंड पाणी पिणे चांगले की वाईट? सत्य जाणून घ्या

स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये १५०० प्रोबेशनरी ऑफिसर (पीओ) पदां साठी भरती सुरु

सर्व पहा

नवीन

पंढरपूर विकास योजना: मुख्यमंत्री फडणवीस यांचा मोठा निर्णय, विठ्ठल नगरीचा कायापालट करणार!

केतन अग्रवाल हत्या प्रकरण: सिया गोयल आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

LIVE: केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन यांना ३ जुलैपर्यंत पोलीस कोठडी

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या रस्त्यांवरील जाहिरात फलकांसाठी महाराष्ट्राकडून नियम अधिक कडक

मटणानंतर दही खाल्ले; नाशिकमधील वृद्ध जोडप्यासाठी हा विसंगत आहार जीवघेणा ठरला, पत्नीचा मृत्यू

पुढील लेख
Show comments