Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अधिवेशन दिवस असा गाजला, हिरेन मृत्यू खा. डेलकर, अन्वय नाईक आत्महत्यावरुन

Webdunia
बुधवार, 10 मार्च 2021 (08:11 IST)
मनसुख हिरेन यांच्या मृत्युमुळे राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे. भाजप खासदार डेलकर, अन्वय नाईक या आत्महत्यांनी राजकारण ढवळून निघाले आहे. एकमेकांवर आरोप करणाऱ्या महाआघाडी सरकार व विरोधकांनी विधीमंडळ अधिवेशानातील मंगळवारचा दिवस गोंधळातच वाया घालविला. सभागृहाचे कामकाज तीन वेळा तहकूब करुन नंतर दिवसभरासाठी तहकूब केले गेले. 
 
गृहमंत्री अनिल देशमुख व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात आरोप – प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. फडणवीस यांनी आक्रमक पवित्रा घेतला. देशमुख हिरेन यांच्या मृत्यू प्रकरणाची माहिती देत होते. दादरा नगर हवेलीचे खा. मोहन डेलकर यांच्या आत्महत्येची एसआयटी चौकशी करणार असल्याची घोषणा त्यांनी केली. फडणवीस यांनी यावरून सरकारला धारेवर धरले.
 
गृहमंत्री म्हणाले, डेलकर पाच वेळा दादरा नगर हवेलीचे खासदार राहिले. त्यांनी मुंबईत येऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत प्रशासक प्रफुल्ल खेडा पटेल यांचे नाव आहे. मी मुंबईत आत्महत्या करीत आहे. कारण मला न्याय मिळेल, अशी अपेक्षा डेलकर यांनी चिठ्ठीत व्यक्त केली आहे.
 
देशमुख डेलकर प्रकरणाची माहिती देत असताना, देवेंद्र फडणवीस यांनी मनसुख हिरेन प्रकरण उपस्थित केले. त्यामुळे डेलकर प्रकरण मागे राहिले. फडणवीस म्हणाले, पोलीस अधिकारी सचिन वाझे यांच्याविरोधात पुरावे असताना त्यांना का पाठिशी घातले जातं आहे. सरकार त्यांना वाचवण्याचा प्रयत्न का करीत आहे, असे प्रश्न उपस्थित केले. वाझे यांचे निलंबन झाले असताना, त्यांनी एका पक्षात प्रवेश केला. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर त्यांचे निलंबन मागे घेण्यात आले, असे म्हणत फडणवीस यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला लक्ष्य केले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग

उबर चालका कडून 14 वर्षांच्या मुलीचा विनयभंग, गुन्हा दाखल

पाकिस्तानच्या गोळीबारामुळे उरी एका भुताच्या शहरात रूपांतरित झाले

महाराष्ट्र-गुजरातमध्ये वादळाचा इशारा Weather Update

अहिल्यानगरच्या श्रीरामपूर पोलिसांनी मोठी कारवाई करत 14कोटी किमतीचे ड्रग्ज जप्त केले

पुढील लेख
Show comments