Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उपमुख्यमंत्री पदावरून देवेंद्र फडणवीस नाराज? या कारणामुळे चर्चा

Webdunia
शुक्रवार, 1 जुलै 2022 (14:52 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे स्विकारली असली तरी ते प्रचंड नाराज असल्याची जोरदार चर्चा आहे. विशेष म्हणजे, या चर्चेला अनेक बाबी कारणीभूत आहेत. फडणवीस हे मुख्यमंत्री राहिले. त्यानंतर ते राज्याचे विरोधी पक्ष नेते बनले. आणि आता राष्ट्रीय नेत्यांनी त्यांना आदेश दिल्यामुळे थेट उपमुख्यमंत्रीपदावर त्यांना रहावे लागत आहे. ही बाब अतिशय अपमानजनक असल्याचे बोलले जात आहे. तसेच, राज्याच्या इतिहासात प्रथमच मुख्यमंत्री झालेली व्यक्ती उपमुख्यमंत्री पदावर कार्यरत झाली आहे.
 
देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम या सर्व अकाऊंटवर कुठेही उपमुख्यमंत्री पदाचा उल्लेख केलेला नाही. तसेच, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा आज वाढदिवस आहे. फडणवीस यांनी नेहमीप्रमाणे नायडू यांना शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, फडणवीस यांनी त्यांच्या नावाखाली कुठल्याही पदाचा उल्लेख केलेला नाही. त्यामुळे फडणवीस हे नाराज असल्याचे स्पष्ट होत आहे. महाविकास आघाडी सरकार कोसळणे, विधान परिषद आणि राज्यसभा निवडणुकीतील भाजपचे लक्षणीय यश आणि आता निर्माण झालेले नवे सरकार या सर्वांमध्ये फडणवीस यांचा मोठा वाटा आहे. असे असताना भाजपने त्यांना दुसऱ्या क्रमांकाचे पद स्विकारायला लावून त्यांचा मोठा अपमान केल्याचे किंवा त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ब्रेक लावल्याचे बोलले जात आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

ठाण्यात शेजाऱ्याच्या पत्नीवर मुलीसमोर बलात्कार, आरोपीला अटक

ठाण्यातील व्यावसायिकाची 1.27 कोटी रुपयांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली, व्हिडीओ व्हायरल

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

पुढील लेख
Show comments