Marathi Biodata Maker

भाजपच्या सरकारला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर

Webdunia
बुधवार, 21 मार्च 2018 (15:04 IST)

ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्याच भाजप व शिवसेनेच्या सरकारला आता त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.मागील तीन वर्षांच्या अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहात वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी औरंगाबाद येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला अद्याप निधी उपलब्ध का करून दिला नाही, याबाबत विचारणा केली. मात्र सरकारने याबाबत अजूनही उत्तर दिलेले नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आणि राज्यपालांच्या अभिभाषणात स्व. मुंडे यांच्या स्मारकाचा उल्लेख नव्हता. याचाच अर्थ या सरकारला स्व. मुंडे यांचा विसर पडला आहे, असेही ते म्हणाले.मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक अध्यासन विभाग सुरू केला. उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विभागाला १५० कोटी अनुदानाची घोषणा केली, मात्र त्या अध्यासनाला एकही रूपयाचे सहकार्य अद्याप करण्यात आलेले नाही, याबाबत मुंडे यांनी खंत व्यक्त केली.याशिवाय, या सरकारने परळीत २०१४ साली स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उसतोड कामगार महामंडळाची स्थापना केल्याची घोषणा केली, पण या महामंडळालाही अजूनपर्यंत अनुदानाची तरतूद केली गेलेली नाही, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

नक्षलमुक्त भारत: गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेत दावा केला आहे की, भारतातून नक्षलवाद समूळ नष्ट झाला

LIVE: पुढील ४८ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा येलो अर्लट जारी

कुख्यात दहशतवाद्यासह नऊ माओवाद्यांनी आत्मसमर्पण केले; आंध्र प्रदेशातील नक्षलवाद संपुष्टात आला

राजा रघुवंशी हत्याकांड : कुटुंब म्हणाले आमचा मुलगा परत आला; राजा रघुवंशीच्या मृत्यूनंतर बाळाचा जन्म

विनाकारण साखळी ओढणाऱ्यांवर होणार कारवाई! रेल्वेने आपली कठोरता वाढवली

पुढील लेख
Show comments