Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महायुतीच्या मेळाव्यात मतभेद चव्हाट्यावर

Webdunia
सोमवार, 15 जानेवारी 2024 (09:17 IST)
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज राज्यात जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीच्या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यामुळे महायुतीतील तिन्ही पक्षांच्या पुढाकारातून  जिल्ह्या-जिल्ह्यांत मेळावे पार पडले. या मेळाव्यातून महायुतीच्या स्थानिक नेत्यांत मनोमिलन हाच मुख्य उद्देश होता. मात्र, या मेळाव्यातून महायुतीतील मनोमिलनापेक्षा मतभेदाचीच चर्चा अधिक रंगली. रायगड जिल्ह्यात तिन्ही पक्षांत नाराजीनाट्य दिसून आले. नगरमध्ये अजित पवार गटाचे नेते अनुपस्थित राहिले, तर नाशिकमध्ये छगन भुजबळांनी मेळाव्याकडे पाठ फिरविली.
 
जळगावात थेट शिंदे गटाच्या नेत्यांनी भाजपला सुनावले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने राज्यात सर्वच पक्ष कामाला लागले असून, महायुतीच्या नेत्यांनी आज जिल्ह्या-जिल्ह्यांत महायुतीचे मेळावे घेऊन वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न केला. तसेच भाजपसोबत शिंदे गट आणि अजित पवार गट सामिल झाल्याने महायुती अधिक मजबूत झाल्याचा संदेश पोचविण्याचा प्रयत्नही केला गेला. एकूणच महायुतीच्या नेत्यांमध्ये मनोमिलन व्हावे, या उद्देशाने हे मेळावे पार पडले. सर्वच मेळाव्यांतून महायुतीचा एकजुटीचा संदेशही दिला गेला. परंतु मनोमिलनापेक्षा नाराजीचीच अधिक चर्चा झाली.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

भारतात कोविड परतला, मुंबईत कर्करोग आणि किडनीच्या रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू

नागपूर : व्यापाऱ्यांनी १५५ कोटी रुपयांचा अपहार केला, गुंतवणुकीच्या नावाखाली मोठी फसवणूक

LIVE: प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यक संपावर

प्राणघातक कॅन्सर झाल्याचे निदान झाल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जो बायडेन यांच्यासाठी ट्विट केले

कारमध्ये बंद झाल्याने चार मुलांचा गुदमरून मृत्यू

पुढील लेख
Show comments