Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे , भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी

Webdunia
मंगळवार, 3 जानेवारी 2023 (14:55 IST)
छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यांचा अवमान करणाऱ्या राज्यपालांना हटवावे आणि भाजपा मंत्र्यांनी माफी मागावी अशी महाराष्ट्राने मागणी केली आहे. या अवमानासंदर्भात भाजपा गप्प बसले असून ते इतर विषयांकडे लक्ष्य वळवीत आहे, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला. मंगळवारी सकाळी प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसने मांडलेल्या भूमिकेवर भाजपाने आक्षेप घेतल्यानंतर त्यावरून राऊतांनी भाजपाच्याच भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. “छत्रपती शिवाजी महाराज हे माफीवीर होते का? ते जुने-पुराणे नेते होते, आता त्यांचं महत्त्व नाही हे राज्यपालांचं विधान भाजपाला मान्य आहे का? यावर आधी उत्तर द्यावं. शिवाजी महाराजांचा अपमान हा सगळ्यात मोठा अपमान आहे. महाराष्ट्राचा स्वाभिमान छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरू होतो आणि तिथेच संपतो. इतर राज्यांना भूगोल आहे, महाराष्ट्राला इतिहास आहे. शिवाजी महाराज इथे जन्माला आले म्हणून हा इतिहास आहे. त्यामुळे महाराष्ट्राने राज्यपालांना हटवण्याची मागणी केली आहे. त्यावर भाजपाने आपले मत आधी व्यक्त करावे. सुरुवात करायची आहे तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानाच्या विषयापासून करावी लागेल. त्यावरून तुम्ही लक्ष दुसरीकडे वळवू शकत नाही”, असे संजय राऊत यांनी म्हटले.
 
“जे उद्योग एकावेळी दीड-दोन लाख रोजगार देऊ शकत होते, असे वेदांतासारखे उद्योग गुजरात निवडणुकीच्या निमित्ताने तिथे पळवले, ज्यामुळे बेरोजगारीचा फटका हा सगळ्यात जास्त महाराष्ट्राला बसतोय”, अशा शब्दांत केंद्रातील आणि राज्यातील सरकारवर टीका करताना राऊत म्हणाले.

Edited by : Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

LIVE: मुंबई गुन्हे शाखेने ४ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुणे: विहिरीत पडलेला बिबट्याच्या पिल्लूला वाचवल्यानंतर जंगलात सोडले

पुढील लेख
Show comments