Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शिक्षणात खंडं पडतोय; शाळा बंदच्या निर्णयाला विरोध

Webdunia
गुरूवार, 13 जानेवारी 2022 (16:24 IST)
कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. आता सर्वच स्तरातून या निर्णयाचा विरोध होत आहे. विद्यार्थी पालकांसह आता शिक्षकांचा आणि तज्ज्ञांचा विरोध ही दिसून येत आहे. 
 
आता सरसकट शाळा बंद विरोधात समाज माध्यमावर मोहीम सुरू केली गेली असून ‘माझे विद्यार्थी, माझी जबाबदारी’ हे स्लोगन देणाऱ्या शिक्षण मंत्र्यांनी विचार न करता हा निर्णय घेतल्याचा आरोप होत आहे.
 
दहावी आणि बारावीच्या सराव परीक्षा सुरू असताना शासनाने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांचे नुकसान करणारा असल्याचा आरोप केला जात आहे. शाळा बंद करण्यापेक्षा नियोजन करून शाळा सुरू ठेवाव्या अशी मागणी शिक्षकांकडून होत आहे. 
 
ग्रामीण भागांमध्ये करोनाचा शिरकाव नसतानाही शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर मोठा परिणाम होताना दिसत आहे कारण ग्रामीण भागात इंटरनेटची अडचण असते. तसेच अनेक विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे अवघड जातं. या सर्व कारणांमुळे शाळा ऑफलाईन पद्धतीने सुरू ठेवण्याची मागणी शिक्षण तज्ज्ञ करत आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

आषाढी यात्रेसाठी पंढरपुरात वारकरी संतांचा मेळा, ७ जून रोजी पालखी सोहळा

मुस्लिम पक्षाला शाही जामा मशीद सर्वेक्षण प्रकरणात मोठा धक्का, उच्च न्यायालयाने पुनर्विचार याचिका फेटाळली

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Covid-19 Alert: कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटची लक्षणे काय आहेत? देशात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली

भारताच्या पुनर्जागरणात साईबाबांचे योगदान, शिर्डी मंदिराला भेट दिल्यानंतर संघ प्रमुख मोहन भागवत यांचे मोठे विधान

पुढील लेख
Show comments