Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवानंतरही बॅनरबाजी, सोशल मिडीयासह सर्वत्र जोरदार चर्चा

Webdunia
शनिवार, 23 जानेवारी 2021 (07:47 IST)
लातूरच्या एका तरुण उमेदवाराने ग्रामपंचायत निवडणुकीत पराभवानंतरही बॅनर लावल्यामुळे त्यांची राज्यात जोरदार चर्चा सुरु आहे. लातूर तालुक्यातील जळकोट येथील कोनळी डोंगरी ग्रामपंचायतीच्या विकास शिंदे कोनाळीकर या तरुणाने निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर चक्क मतदारांचे आभार मानणारे बॅनर लावले आहेत. विशेष म्हणजे अवघी १२ मतं पडूनही त्याने बॅनरबाजी केली आहे.
 
‘वाटलं होतं गड्या आपला गाव बरा…पण तुम्ही म्हणालो पसारा भरा. आम्ही जातो आमच्या गावा… आमचा राम राम घ्यावा. समाजन धिक्कारलं… गावानं नाकारलं… पण आम्हाला देश स्वीकारणार…! आमच्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या… बारा मतदारांचे जाहीर आभार…! ना जातीसाठी… ना धर्मासाठी… आमचा लढा मातीसाठी… जगेन तर देशासाठी… मरेन तर देशासाठी. मला ज्यांनी बारा मते देऊ संघर्ष करण्याचे ताकद दिली त्यांचे सात जन्मही उपकार फिटणार नाही. तुमच्या मताचे देशात नाव करीन. खंडेराया नगरीचे पराभूत उमेदवार विकास शिंदे कोनाळीकर’ अशा आशयाचं हे बॅनर आहे.
 
विकास शिंदे कोनाळीकार याचं अहमदपूर इथं पॉलिटेक्निकचं शिक्षण सुरू असून पुण्यात तो काही काळासाठी राहत होता. त्यानंतर गावाचा विकास करण्यासाठी त्याने ग्रामपंचायत निवडणूक लढवण्याचे ठरवले. निवडणुकीत त्याला अवघी बारा मतंच मिळाली. पण पराभवानंतरही मतदान करणाऱ्या १२ मतदारांचे आभार मानल्यामुळे तो सोशल मीडियावर हिरो ठरतोय. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

'एक देश, एक निवडणूक'वर राज ठाकरेंचा टोला, म्हणाले- महाराष्ट्रात पहिली महापालिका निवडणूक झाली पाहिजे

मद्यप्रेमींना दिलासा, या राज्यात नवीन अबकारी धोरणामुळे किमती कमी होणार

पुढील लेख
Show comments