Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

माजी मंत्री टोपेंच्या गाडीवर टोळक्याकडून दगडफेक !

Webdunia
शनिवार, 2 डिसेंबर 2023 (19:41 IST)
राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री राजेश टोपे यांच्या गाडीवर जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आवारात चार ते पाच जणांच्या टोळक्याकडून घोषणाबाजी करत दगडफेक केल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतून ही दगडफेक झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. घटनास्थळी लाकडी दांडा आणि ऑइलची बाटली आढळून आली आहे.
 
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुका सुरू आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील आमदार, पदाधिकारी बँकेत एकत्र आले होते. या बैठकीस राजेश टोपेही उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी इतर लोकप्रतिनिधींनी लावलेल्या वाहनाच्या ठिकाणीच आपली गाडी पार्क केली होती. बँकेच्या आवारात लावलेल्या टोपेंच्या या गाडीवरच अज्ञातांनी दगडफेक केली. जालना जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निवडणूक होती.
 
या प्रकरणी आज बिनविरोध निवडणुकीची सुद्धा प्रक्रिया पार पडली. पण काही असंतुष्ट लोकांनी मुद्दाम गाडीवर दगडफेक केली. यामध्ये गाडीचा काच फुटला. असंतुष्ट लोकांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलिसांनी योग्य ती कारवाई केली पाहिजे. ज्या लोकांनी कायदा हातात घेतला असेल त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे. जिल्ह्यातील सर्व निवडणूक बिनविरोध पार पडलेली असताना ज्यांनी अशा पद्धतीने कायदा हातात घेऊन काम केले असेल त्यांना शिक्षा व्हायला पाहिजे, असे मत राजेश टोपे यांनी व्यक्त केले.

Edited by -Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments