Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

औरंगाबादमध्ये उत्खननात ब्रिटिश काळातील नाणी सापडली

Webdunia
मंगळवार, 21 डिसेंबर 2021 (12:26 IST)
औरंगाबादातील एमजीएम परिसरातील प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे. स्मारकाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. .सोमवारी सायंकाळी भिंतीसाठी खणनकाम सुरू असताना या ठिकाणी प्राचीन नाणी सापडली. कंत्राटदाराने पालिका अधिकाऱ्यांना कळवल्यानंतर हे नाणे पुरातत्व विभागाकडे सुपूर्द करण्यात आले. प्रियदर्शनी उद्यानात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारले जात आहे.स्मारकाभोवती सुरक्षा भिंत बांधण्याचे कामही सुरू करण्यात आले आहे. स्मारकाच्या पाठीमागील भिंत खोदत असताना खोदकाम करणाऱ्यांना एका कापडी पिशवीत काही तरी सापडले . त्यांनी काम थांबवून पिशवी बाहेर काढली आणि पिशवी उघडून पाहिल्यावर त्यांना त्यात ब्रिटिश काळातील नाणी सापडली .मजुरांनी तातडीने ही माहिती कंत्राटदार रोहित स्वामींना दिली .उत्खनन कामाच्या ठिकाणी रोहित स्वामी पोहोचल्यावर त्यांनी उत्खनन करताना पिशवी सापडल्याची माहिती आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना  दिली .वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरून त्यांनी दिलेल्या सूचनेनुसार, रोहित स्वामींनी नाण्याची पिशवी पुरातत्त्व विभागाकडे देण्यात आली . अधिकारी गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, पिशवीत ठेवलेल्या नाण्याचे वजन 1 किलो 958 ग्रॅम आहे. ही नाणी व्हिक्टोरिया राणीच्या काळातील असून .नाणी 1854, 1861, 1881 च्या तारखेची आहेत. नाणी तांबे किंवा पितळ्याची असावी असा अंदाज गोरे यांनी दर्शविला आहे.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments