Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देवाच्या चरणी तरी खरे बोला- सामनातून फडणवीसांवर टीका

Webdunia
सोमवार, 28 मार्च 2022 (09:15 IST)
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिर्डीत साईबाबांचं दर्शन घेतलं. तिथे ते म्हणाले, "राजकारण गेलं चुलीत, इथलं गव्हर्नन्स ठीक राहिलं पाहिजे. त्याला बट्टा लागला आहे. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती."
 
त्यांच्या या वक्तव्याला उत्तर देताना सामनाने म्हटले, "महाराष्ट्राची इज्जत आणि गव्हर्नन्स चुलीत घालण्याचं काम ते स्वत:च करत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही असं देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा का?
 
"देवाच्या चरणी तरी खरं बोला. देशातील भाजपशासित राज्यात चांगल्या प्रशासनाचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पाहा म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल,"

भाजपने काय करावं हा त्यांचा प्रश्न आहे. पण त्यांनी महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी खेळू नये. नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचं काम सुरु असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केली. राज्यातल्या प्रत्येक मराठी माणसाची हीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे व त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

कोळसा खाणीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोट,अनेकांचा मृत्यू

IND vs BAN Test : चेन्नई कसोटीत भारताने बांगलादेशचा 280 धावांनी पराभव केला

IND vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीसाठी भारतीय संघ जाहीर

पोलिसांच्या सरकारी रिव्हॉल्व्हरने स्वतःवर गोळी झाडली, मृत्यू

वाशिमच्या सरकारी रुग्णालयात किंग कोब्रा विषारी साप शिरला

पुढील लेख
Show comments