Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बाप्परे, कुटुंबात संपत्तीचा वाद, एकाच कुटुंबातील 5 जणांची आत्महत्या

Webdunia
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (10:12 IST)
मालमत्तेच्या वादातून नांदेडच्या  हदगाव तालुक्यातील एकाच कुटुंबातील 5 जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. प्रवीण कवानकर यांनी पत्नी आणि एक मुलगा आणि दोन मुलींसह यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारुन आत्महत्या केली. कवानकर कुटुंबांतील दोन भावातील मालमत्तेचा वाद गेल्या काही दिवसापासून सुरू होता. 5 जणांपैकी तिघांची प्रेते मिळाली, दोघांचा अजूनही शोध लागला नाही, असे पोलिसांनी सांगितले. 
 
प्रवीण भगवानराव कवानकर (वय ४२), त्यांच्या पत्नी अश्विनी प्रवीण कवानकर (वय ३८), मोठी मुलगी सेजल कवानकर (वय २०), दुसरी मुलगी समीक्षा (वय १४) व लहान मुलगा सिद्धेश (वय १३) अशी मृतांची नावे आहेत. प्रवीण कवानकर, अश्विनी कवानकर, सिद्धेश यांच्या मृतदेहाचा शोध लागला आहे. समीक्षा आणि सेजल यांचे मृतदेह सापडले नाहीत.
 
कवानकर कुटुंब दोन दिवसांपूर्वी हदगाव येथून चारचाकी वाहन भाड्याने घेवून सहस्त्रकुंड येथे पोहचले होते. कवानकर कुटुंबीयांनी मेहुणा येत आहे,असे सांगून त्यांनी वाहन परत पाठवल्याची माहिती आहे. विदर्भाच्या बाजुने असलेल्या मुरली गावानजीक धबधब्यात गुरुवारी पाचही जणांनी उड्या मारून जीवनयात्रा संपविली. 
 
गवानराव कवानकर हे कवाना ता.हदगाव येथील प्रतिष्ठित व्यापारी, हदगाव येथे त्यांचे मोठे किराणा दुकान आहे. त्यांच्या दोन मुलात मालमत्तेचा वाद सुरू होता. हा वाद टोकाला पोहोचला. या वादाला कंटाळून मोठा मुलगा प्रवीण यांनी कुटुंबासह सहस्त्रकुंड धबधब्यात उडी मारून सर्वांना संपविले.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान जगन्नाथाची मूर्ती डिजिटल पेमेंटद्वारे खरेदी केली, व्हिडीओ व्हायरल

Tirupati Laddu Case:तिरुपती बालाजी मंदिराच्या प्रसादात भेसळ,सीएम चंद्राबाबू नायडूंचं मोठं वक्तव्य, म्हणाले- 'कोणालाही सोडणार नाही

काँग्रेस परदेशी भूमीवर भारताचा अपमान करते,पंतप्रधान मोदी वर्ध्यात म्हणाले

मग 1 मिनिटात सरळ करू, नितीन गडकरी यांचा उघडपणे कुटुंबवाद आणि जातीवादाच्या राजकारणावर जोरदार हल्ला

नागपुरात गणपती विसर्जन मिरवणुकीत वेळी भीषण अपघात10 महिला मृत्युमुखी

पुढील लेख
Show comments