Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शेतकरी संपामुळे लासलगाव बाजार समितीत शेतमालाची आवक घटली

Webdunia
शेतकरी वर्गाने पुकारलेल्या संपाचा मोठा फटका देशातील नव्हे तर आशियातील सर्वात मोठी कांदा बाजार पेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीला बसला आहे. कोणताही माल विक्री करायचा नाही म्हणून अनेकांनी माल विक्रीस आणलाच नाही, त्यामुळे उलाढाल ठप्प झाली आहे.

शेतकरी संपाला गेल्यावर्षी एक जून पासून सुरू झालेल्या संपानंतरही शेतकऱ्यांचे प्रश्न अद्याप सुटलेले नसल्याने महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे.आजपासून सुरू असलेल्या शेतकरी संपामुळे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत आज दिवसभरात फक्त ९ वाहने लीलावास आली.संपूर्ण बाजार आवार हा ओस पडलेला होता.लासलगाव मधील सर्व अर्थकारण हे या बाजार समितीवरच अवलंबून असल्याने संपूर्ण लासलगाव मध्ये संपाच्या पहिल्या दिवशिच परिणाम जाणवू लागलेला आहे.

शेतकरी संपामुळे कांदा,भाजीपाला,धान्य यांच्या आवकेवर फटका बसल्याचे दिसून आले.तर दुसरीकडे ग्रामीण अर्थकारण संकटात सापडलं आहे. शेतकरी संपामुळे आशियातली सर्वात मोठी कांदा बाजार समिती असलेली लासलगाव बाजार समिती ओस पडली आहे. दररोज होणारी १५ ते २० हजार क्विंटल कांद्याची आवक आणि दोन ते अडीच कोटी करोडो रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे.संपूर्ण कर्जमाफी व शेतमालास उत्पादन खर्चासह ५० टक्के हमीभावासह विविध मागण्यांसाठी गेल्या वर्षी शेतकऱ्यांनी राज्यात संप पुकारला होता. या संदर्भात सरकारने दिलेल्या आश्वासनांची वर्षभरानंतरही पूर्तता न झाल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली आहे. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्या, यासाठी काल पासून (शुक्रवार) दहा दिवस शेतकरी संप पुकारला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments