Marathi Biodata Maker

सरकार आम्हाला इच्छामरण द्या या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मागितली परवानगी

Webdunia
बुधवार, 10 जुलै 2019 (09:51 IST)
नगर येथील जामखेड तालुक्यातील खर्डा भागातील अमृतलिंग लघू पाटबंधारे प्रकल्पाच्या सांडव्याचे काम नवीन आराखड्यानुसार करावे, अन्यथा आम्हाला इच्छा मरणाची परवानगी द्यावी, असे निवेदन प्रकल्पग्रस्त शेतकर्‍यांनी जामखेडच्या तहसिलदारांना दिले. नगरचे पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्याच तालुक्यातील शेतकऱ्यांनी इच्छामरणाची परवानगी मागितल्याने खळबळ उडाली, खर्डा, नागोबाचीवाडी परिसरासाठी वरदान ठरणाऱ्या अमृतलिंग प्रकल्पाच्या कामास ६ मे १९९९ रोजी मंजुरी मिळाली होती. शेतकऱ्यांच्या जमीनीही संपादीत झाल्या. मात्र जमीनीच्या मोबदल्यासाठी शेतकऱ्यांना वेळोवेळी आंदोलने करावी लागली होती. भरपाई मिळावी, यासाठी एका प्रकल्पग्रस्त शेतकऱ्याने खर्डा येथे विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. या घटनेनंतर अमृतलिंग प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांच्या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष गेले होते. निधीअभावी या प्रकल्पाचे काम रखडले गेले होते. आमदार प्रा. राम शिंदे यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यानंतर त्यांनी आपल्या मंत्रीपदाच्या माध्यमांतून रखडलेले काम मार्गी लावण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला. परंतु, निधी आल्यानंतर तलावाच्या सांडव्याचे सुरू असलेले काम सदोष असल्याच्या तक्रारी मागील १९ वर्षांपासून प्रकल्पग्रस्तांकडून होत आहेत. सांडव्याच्या सदोष कामामुळे उरलेल्या जमीनी पाण्यात जाण्याच्या भीतीने शेतकरी वर्ग अस्वस्थ झाला आहे.आजघडीला अमृतलिंग प्रकल्पाचा सदोष पद्धतीने सांडवा झाल्यास प्रकल्प भरल्यानंतर पाणी वेगांत येऊन गट नं. १२७ मधील शेतकऱ्यांच्या जमीनी वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जर असे झाले तर आधीच प्रकल्पबाधीत असणारे शेतकरी पुर्णपणे भूमीहीन होतील. इच्छा मरणाची मागणी करणाऱ्या निवेदनावर प्रमोद सुर्वे, रामहरी खाडे,सुर्यभान खाडे, संजय सुर्वे, बापू सुर्वे आधी परिसरातील शेकडो शेतकऱ्यांच्या सह्या आहेत. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

२०२९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी महिला आरक्षण कायदा लागू होऊ शकतो, सरकार अर्थसंकल्पीय अधिवेशनात सुधारणा विधेयक आणण्याच्या तयारीत आहे

राज्यसभेत पंतप्रधान मोदींचे महत्त्वाचे वक्तव्य: युद्धामुळे ऊर्जा संकट अधिक गडद, ​​भारतासमोर 'मोठी परीक्षा'

LIVE: मुंबई आणि पुणे ते नागपूर दरम्यान ८ उन्हाळी विशेष गाड्या धावणार

महाराष्ट्रात मोठे बदल, लोकसभेच्या जागा ४८ वरून ७२ पर्यंत वाढण्याची शक्यता

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात, समीर वानखेडे यांची मुंबई उच्च न्यायालयात एफआयआर रद्द करण्याची मागणी

पुढील लेख
Show comments