Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ठाणे हादरले! क्रिकेटवरून मारामारी, 1 ठार, 6 गंभीर जखमी

Webdunia
गुरूवार, 4 एप्रिल 2024 (09:56 IST)
महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना घडली आहे. भिवंडी शहरात क्रिकेटच्या जुन्या वादातून दोन गटात रक्तरंजित हाणामारी झाली. यावेळी इतर गटातील लोकांनी एकमेकांवर चाकू आणि काठ्यांनी हल्ला केला. या घटनेमुळे परिसरात घबराटीचे वातावरण आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भिवंडीतील शांतीनगर परिसरात मंगळवारी घडलेल्या या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. झुबेर शोएब शेख (वय ४६) असे मृताचे नाव आहे. या मारामारीत अबू हमजा शेख, इस्तियाक शोएब शेख (वय ३२), साजिद वहाब शेख (वय ३३), आसिफ वहाब शेख (वय ३६), शाहबाज सोहेल शेख (वय ३४) आणि नोएब सोहेल शेख हे गंभीर जखमी झाले.
 
अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी भिवंडीत क्रिकेट खेळण्याच्या वादातून दोन गटात हाणामारी झाली होती. त्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हाही दाखल केला होता. काल या वादातून एका गटाने दुसऱ्या गटावर धारदार शस्त्राने हल्ला केला.
 
जे मिळेल ते घेऊन आरोपी एकमेकांवर हल्ले करू लागले. या काळात जोरदार हाणामारी झाली. चाकू हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. त्यानंतर स्थानिक लोकांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यात सात जण जखमी झाले, त्यापैकी जुबेरचा रुग्णालयात मृत्यू झाला. इतर काहींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.
 
या घटनेमुळे शांतीनगर परिसरात दहशतीचे वातावरण आहे. या घटनेचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला असून पुढील कारवाई सुरू आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

LIVE: हर्षवर्धन सपकाळ यांनी उद्धव यांची भेट घेतली

सुरक्षा दलांना मोठे यश, लष्करच्या ३ दहशतवादी साथीदारांना अटक

इस्रायलचा पुन्हा गाझावर हल्ला, ८२ जणांचा मृत्यू

दिल्ली ते मुंबई-हावडा अंतर कमी होणार, दोन्ही मार्गांवर गाड्यांचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेने आवश्यक ती मान्यता दिली

मुंबईत ४ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह दोन आरोपींना अटक

पुढील लेख
Show comments