Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक

उमदीत टोळी युद्ध, दोघांचा खून, एक चिंताजनक
, बुधवार, 9 मार्च 2022 (15:02 IST)
सांगलीतील जत तालुक्याच्या उमदी येथे दोन टोळी युद्धाचा मंगळवारी रात्री भडका उडाला. या भडक्याने दोन तरुणांचा बळी घेतला आहे. दोघा तरुणांना धारधार शत्राने वार करून निर्घृण खून करण्यात आले. तर एक जण गंभीर जखमी असून त्याचीही प्रकृती चिंताजनक बनली आहे. उमदी पंढरपूर मार्गावर हा थरार घडला आहे. या दुहेरी खुनाच्या घटनेने जत तालुका हादरला आहे. या प्रकरणी संशयित 12 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
 
मदगोंडा नागा बगली (वय 24) व संतोष राजू माळी (वय 23) रा.उमदी अशी मृत तरुणांची नावे आहेत. तर प्रकाश मल्लिकार्जून परगोंड (वय 22) हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सोलापूर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी पोलीस अधिक्षक दीक्षित कुमार गेडाम, उपविभागीय अधिकारी रत्नाकर नवले यांनी भेट दिली आहे. उमदी येथे मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सोशल मीडियावरील वादातून आणि पूर्वैमनस्यातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून जत येथील एका टोळीचा म्होरक्या, उमदी येथील सहकारी तसेच उमदी येथील एक टोळी यांच्यात सतत संघर्ष सुरू होता. त्याची किनार या घटनेला असल्याचे सांगण्यात येत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

युद्धाचा परिणाम देशाच्या आर्थिक विकासावर होईल, महागाई वाढण्याची शक्यता