Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात पहिल्यांदाच 'इतका' कोरोना रुग्णांचा आकडा वाढला

Webdunia
शनिवार, 27 जून 2020 (08:34 IST)
महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच कोरोना रुग्णांचा आकडा एका दिवसात ५ हजारांपेक्षा जास्तने वाढला आहे. एका दिवसात कोरोनाचे सर्वाधिक ५,०२४ रुग्ण वाढले आहेत. तर १७५ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे, यातले ९१ मृत्यू हे मागच्या ४८ तासातील आहेत, ८४ मृत्यू हे मागच्या काळातील आहेत. सध्या राज्यातला मृत्यूदर हा ४.६५ टक्के एवढा आहे. राज्यात आत्तापर्यंत ७,१०६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
 
राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या १,५२,७६५ एवढी झाली आहे. तर सध्या ६५,८२९ रुग्ण हे ऍक्टिव्ह आहेत. २,३६२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, त्यामुळे पूर्णपणे बरे होऊन घरी गेलेल्या रुग्णांची एकूण संख्या ७९,८१५ एवढी झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे व्हायचे प्रमाण ५२.२५ टक्के एवढे झाले आहे. 
 
मुंबईमध्ये  दिवसभरात कोरोनाचे १,२९७ रुग्ण सापडले. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ७२,१७५ एवढा झाला आहे. तर मुंबईमध्ये ४४ मृत्यूंची नोंद झाल्यामुळे एकूण मृत्यूंची संख्या ४,१७९ एवढी झाली आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC 12th Result: राज्य शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले

Cyber Attack: पाकिस्तान सायबर फोर्स'चा पहिला हल्ला, महत्त्वाची संरक्षण माहिती लीक होण्याचा दावा

LIVE: ‘अजित पवार शकुनी तर फडणवीस दुर्योधन’, संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

महाराष्ट्र महिला आयोगाने राष्ट्रीय महिला आयोगाला पत्र लिहून ओटीटीच्या अश्लील सामग्रीबाबत ही मागणी केली

एटीएसने मोस्ट वॉन्टेड नक्षलवाद्याला अटक केली,13 मे पर्यंत रिमांडवर पाठवण्याचे न्यायालयाचे आदेश

पुढील लेख
Show comments