Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो सदिच्छाचे वडील

Webdunia
शनिवार, 21 जानेवारी 2023 (08:26 IST)
१४ महिन्यांपूर्वी मुंबईतील जे. जे. ग्रॅन्ट मेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणारी पालघरची सदिच्छा साने बेपत्ता झाली होती. त्यानंतर आज या प्रकारांत आरोपी असलेल्या मितू सिंहने तिची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करुन सदिच्छाचा मृतदेह वांद्रे बँड स्टँडच्या समुद्रात फेकल्याचेही त्याने कबूल केले आहे. याप्रकरणी पोलिसांनी वांद्रे बँड स्टँडजवळ समुद्रात सदिच्छा सेनेचा मृतदेह शोधण्याचे काम सुरु केले होते.
 
मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरात आरोपी मितू सिंहने आपला जबाब अनेकदा बदलला आहे. त्यामुळे पोलिसांचा संशय त्याच्यावर अधिक वाढत गेला. अखेर त्याने आपणच तिची हत्या केल्याची कबुली दिली आहे. तसेच, ज्या ठिकाणी सदिच्छाचा मृतदेह टाकला होता ती जागा देखील पोलिसांना दाखवली. आज सकाळपासून पोलिसांनी नौदलाच्या साहाय्याने शोधमोहीम सुरु कलेची होती. मात्र, काहीही हाती न लागल्याने ही मोहीम थांबवण्यात आली. मात्र, पुन्हा एकदा पोलीस दुसऱ्या यंत्रणांच्या साहाय्याने शोध घेणार असल्याचे सांगितले आहे.
 
सदिच्छा सानेचे वडील मनीष साने यांनी यावर म्हंटले आहे की, "सदिच्छा सानेची हत्या झाल्याचा पोलिसांचा दावा चुकीचा आहे. हे प्रकरण दडपण्यासाठी पोलीस बनाव करत आहेत." असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. ते पुढे म्हणाले की, गेले वर्षभर आम्ही मितू सिंह हाच आरोपी असल्याचे सांगत होतो. मात्र पोलिसांनी तेव्हा या प्रकरणाचा योग्य तपास का केला नाही? जर मितू सिंहने माझ्या मुलीची हत्या करुन समुद्रात फेकले असेल तर तिचा मृतदेह का सापडत नाही?" असा सवाल त्यांनी विचारला आहे.
 
Edited By- Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments