Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव पाटील यांचे 90 व्या वर्षी निधन

Webdunia
बुधवार, 23 ऑगस्ट 2023 (10:47 IST)
Gulabrao Patil passed away :अमळनेर तालुक्याचे माजी आमदार गुलाबराव वामनराव पाटील यांचे वयाच्या 90 व्या वर्षी मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

गुलाबराव पाटील हे तीन वेळा एकूण 13 वर्षे जनता दलाचे आमदार होते. ते समाजवादी विचारसरणीचे होते. त्यांची ओळख फर्डे वक्ते म्हणून होती. ते दीर्घकाळी जनता दलात राहिले नंतर त्यांनी राजकीय जीवनाच्या अखेरच्या टप्प्यात त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

मुलुख मैदान तोफ म्हणून माजी आमदारांची ओळख होती. त्यांचा राज्यात दरारा होता. साची संदेश वृत्तपत्राचे पत्रकार म्हणून त्यांनी काम केले आहे. अहिराणीत शपथ घेणारे ते एकमेव होते. 
 
गुलाबराव वामराव पाटील यांनी 1978 साली पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या दाभाडे रामदास सुग्राम यांचा पराभव केला होता. यानंतर त्यांनी 1980 साली जेपींच्या जनता पार्टीकडून निवडणूक लढवली, त्यांनी इंदिरा काँग्रेसच्या संभाजी गोविंदराव चव्हाण यांचा पराभव केला, यानंतर त्यांचा अमृतराव पाटील यांच्याकडून पराभव झाला. मात्र गुलाबराव पाटील पुन्हा 1990 साली, काँग्रेसचे दाजिबा पर्बत पाटील यांचा पराभव करुन पुन्हा आमदार झाले.ते आधी लोकल बोर्डावर, यानंतर जिल्हा परिषदेवर निवडून आले होते.
त्यांनी शेतकऱ्यांसाठी शिंगाडे मोर्चा काढला. त्यांची अंत्ययात्रा 23 ऑगस्ट रोजी दहीवद ,अमळनेर येथून दुपारी 2 वाजता निघणार आहे. 
 
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments