Publish Date: Friday, 30 January 2026 (17:42 IST)
Updated Date: Friday, 30 January 2026 (01:44 IST)
रायगड जिल्ह्यांतील कर्जत तालुक्यांत अनंत चतुर्दशी चे गणपती विसर्जन करण्यांत येत असताना चार जण बुडाले. बुडालेल्या तरुणांना वाचविण्याचा प्रयत्न करण्यांत येत असताना एकाचा बुडून मृत्यू झाला, दोनजण बेपत्ता असुन एकाला वाचविण्यांत यश आले आहे. ही घटना कर्जत तालुक्यांतील भिवपुरी गावानजीक तांबोई गावातुन जाणाऱ्या उल्हास नदीं मध्ये आज संध्याकाळी साडेसात वाजण्याच्या सुमाराला घडली.
या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी रवाना झाले असुन बेपत्ता तरुणांचा शोध घेण्यासाठी रेस्क्यू टिम कसुन प्रयत्न करत आहे.