Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

दापोली : मित्रांनेच केला मित्राचा खून

Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (08:29 IST)
दापोली तालुक्यातील पावनळ येथे तरुणाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. सुशांत किशोर परब असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी दापोली पोलिसांनी तपास करून हा खून त्याच्या मित्राने केल्याचा संशय व्यक्त केला आहे. या प्रकरणी मित्राला अटक केली आहे. खूनाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही.
 
पोलिसांतून मिळालेली अधिक माहिती अशी, २ जानेवारी रोजी करंजाळी येथे अनिल रामाणे हे शेतीचे कवळ तोडण्यासाठी गेले असता त्यांना एका पुरुषाचा मृतदेह नग्नावस्थेत आढळला. त्यांनी ही बाब पोलीस पाटील प्रकाश मोरे यांना सांगितली. मोरे यांनी याची माहिती दापोली पोलिसांना दिली. त्यानंतर हा मृतदेह सुशांत परब याचा असल्याचे निष्पन्न झाले. आकस्मिक मृत्यूची पोलिसांत नोंद केली होती. तपासा दरम्यान सुशांत त्याच्या आजीकडे करंजाळी डिंगणकरवाडी येथे रहात होता. त्याचा अंधेरी (मुंबई) येथील मित्र जयकिसन ओमप्रकाश सिंग हा १ जानेवारी रोजी रात्री करंजाळी येथे त्याला भेटायला आला होता.
 
रात्रीचे जेवण करून दोघे बाहेर पडले. त्यानंतर जयकिसन याने सुशांतचा काटा काढला. त्याच्या अंगावरील सर्व कपडे झाडावर अडकवून ठेवले. त्यानंतर जयकिसन सकाळी सुशांतच्या घरी आला व त्याच्या आजीला आपण मुंबईला जात असल्याचे सांगून बाहेर पडला. दरम्यान सुशांतचा मृतदेह सापडल्यावर पोलिसांनी तपास सुरू केला.
मोबाईल कॉलच्या लोकेशनवरून जयकिसनला खेड येथील लॉजमधून ताब्यात घेतले. जयकिसन याला अंमली पदार्थाचे व्यसन असल्याचेही तपासात निष्पन्न झाले. मंगळवारी सुशांतच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments