Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Gadchiroli : वीज पडून पती-पत्नी आणि दोन चिमुकल्यांचा मृत्यू

Webdunia
मंगळवार, 25 एप्रिल 2023 (10:01 IST)
गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा-देसाईगंज मार्गावरील तुळशी फाटा येथे एका कुटुंबावर वीज पडल्याची दुर्देवी घटना घडली आहे. एका लग्न समारंभातून परत येताना झाडाखाली विसावा घेत असलेल्या एका कुटुंबावर वीज कोसळून पती -पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. भारत राजगडे (35), अंकिता भारत राजगडे (28), बाली भारत राजगडे (2 ), देवाशी भारत राजगडे (4) अशी मयताची नावं आहेत. 

आमगाव बुटी गावात वास्तव्य करणारे भारत राजगडे आपल्या पत्नी आणि दोन मुलांना घेऊन लग्न समारंभाला गेले होते. गावाला परत येताना रस्त्यात त्यांना पाऊस लागला. विजांचा कडकडाटासह जोरदार पाऊस सुरु झाल्यामुळे ते रस्त्यालगत एका झाडाखाली उभारले. काळाने तितक्यात झडप घातली आणि ज्या झाड खाली ते पावसापासून संरक्षणासाठी उभारले होते. त्याच झाडावर वीज कोसळून चौघांचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला. अवघे कुटुंब क्षणातच उध्वस्त झाले. या घटनेमुळे आमगाव बुटी गावात हळहळ व्यक्त केली जातात असून शोककळा पसरली आहे.

सध्या राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने उच्छाद मांडला असून  शेतीचं खूप नुकसान झालं आहे. वीज कोसळून अनेक जनावरे देखील दगावले आहे. चंद्रपुरात एका शेतकऱ्याच्या सुमारे 36 शेळ्या वीज कोसळल्याने ठार झाल्या आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान झाले असून शेतीच्या पिकांचं देखील नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.  
 
Edited by - Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments