Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

देशात पहिली घटना वयाच्या ५२ व्या वर्षी महिलेने तीन बाळांना जन्म दिला

Webdunia
शुक्रवार, 22 फेब्रुवारी 2019 (09:49 IST)
पुण्यातील साईश्री हॉस्पिटलमध्ये वयाच्या ५२ व्या वर्षी महिलेने तीन बाळांना जन्म दिला असून, दोन मुले आणि एक मुलगी असे अपत्य जन्मले आहेत. या पन्नाशी नंतरच्या वयात महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येणं भारतात प्रथमच घडले आहे. या महिला ५२ वर्षीय मूळच्या पुणे येथील आहेत. जन्म घेतला तेव्हा यातील एका बाळाची स्थिती नाजूक होती. पण, आता तिन्ही बाळांची स्थिती उत्तम आहे. डॉ. गिरीश पोटे म्हणाले की महिला ५२ वर्षांची आहे तर त्यांचं आरोग्य उत्तम होतं. त्यामुळे अशा प्रकारची आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं यशस्वीरित्या जन्माला येणं सोपं झाल आहे. मुख्य म्हणजे एखाद्या ५२ वर्षीय महिलेला आयव्हीएफच्या माध्यमातून तिळं जन्माला येण्याची ही भारतातील पहिलीच घटना आहे. बाळांच्या आईच्या सांगण्यानुसार आयव्हीएफ सेंटरमधून केलेल्या पहिल्याच प्रयत्नात आम्हाला यश मिळालंय. तीन बाळांमुळे आमच्या कुटुंबात मोठा आनंदाचा क्षण आला आहे. त्यामुळे आता अनेक स्त्रिया ज्यांना माता व्हायचे आहे त्याच्या साठी एक आशेचा किरण दिसू लागला आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशीफल 16 सप्टेंबर ते 22 सप्टेंबर 2024

14 सप्टेंबरपासून बुध नक्षत्र परिवर्तन, 3 राशींसाठी हा आठवडा चांगला राहणार

18 सप्टेंबरला शुक्र गोचरमुळे मालव्य योग, 3 राशींना मिळेल छप्‍पर फाड धन

जिवंत व्यक्ती स्वतःच श्राद्ध करू शकते का? माणसाने जिवंत असताना त्याचे श्राद्ध कधी करावे?

अनंत चतुर्दशी 2024: गणेश विसर्जनाची वेळ आणि योग्य पद्धत

सर्व पहा

नवीन

महाराष्ट्रात तिसरी युतीची शक्यता, या नेत्यांना एकत्र आणण्याचे प्रयत्न, MVA आणि महायुतीमधील तणाव वाढणार

भंडारा: गणेश विसर्जन मिरवणुकीत छत कोसळले, 30 हून अधिक महिला जखमी

7 रुपयांत इंटरनेट आणि कॉलिंगचा लाभ, या टेलिकॉम कंपनीने दिली जबरदस्त ऑफर

तिरुपती येथील लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर, मुख्यमंत्री नायडूंचा खळबळजनक आरोप

अंधेरी लोखंडवाला कॉंम्प्लेक्स मध्ये भीषण आग

पुढील लेख
Show comments