Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

निवडणुकीच्या तयारीला लागा, मनसे स्वबळावर लढणार; राज ठाकरेंचे आदेश

Webdunia
गुरूवार, 3 फेब्रुवारी 2022 (08:30 IST)
काही दिवसांपासून राज्यात मनसे-भाजप युतीबाबत चर्चा सुरु होती. त्यावर आता पूर्णविराम लागला आहे. मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आगामी निवडणुकीत स्वबळावर लढण्यासाठी सज्ज राहा असे आदेश दिले आहेत. वांद्रे येथील एमआयजी क्रिकेट क्लब येथे मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला राज्यभरातून मनसे नेते, सरचिटणीस, उपाध्यक्ष हजर होते.
 
पुढील काही महिन्यात राज्यात महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरु होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर तयारीसाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना कानमंत्र दिला. युतीच्या चर्चेत न पडता स्वबळावर निवडणुकीसाठी तयार राहा. युती होईल की नाही ते पुढे बघू असं त्यांनी सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी वार्डनिहाय कमिटी नेमली जाणार आहे. ही कमिटी १५ फेब्रुवारीपर्यंत अहवाल तयार करुन राज ठाकरेंना देणार आहे.
 
या बैठकीनंतर मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले की, आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यासाठी तयारी लागण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिलेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची टीम प्रत्येक महापालिका क्षेत्रात जाणार आणि तेथील इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतील. परंतु निवडणूक होणार की नाही हा प्रश्न आहे. ज्यावेळेला निवडणुकीचं चित्र स्पष्ट होईल तेव्हा मनसेचा जाहीरनामा पुढे येईल असं त्यांनी सांगितले.
 
मनसेत गटाध्यक्षापासून नेते मंडळीपर्यंत सगळ्यांना माहिती आहे की, आपण आतापर्यंतच्या निवडणुका स्वबळावर लढवल्या आहेत. यापुढेही निवडणूक स्वबळावर लढण्यासाठी पदाधिकारी आजही सज्ज आहे. २००९ पासून आम्ही कुणाशीही युती केली नाही. जर, तर यावर राजकारणात बोलून चालत नाही. समोरुन जर प्रस्ताव आला तर बोलणी सुरुच ठेवावी लागतात. युतीचा निर्णय राज ठाकरेच घेतील. बाकी कुणीही घेऊ शकत नाही. सगळ्याच महापालिका निवडणुकीत मनसे स्वबळावर निवडणूक लढवेल अशी माहितीही बाळा नांदगावकर यांनी दिली.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: छत्रपती संभाजीनगर मध्ये तलावात बुडून दोन मुलांचा मृत्यू

संजय राऊत यांनी शिवसेनेचे पतन घडवले, बावनकुळे म्हणाले पुस्तकाचे नाव 'नरक का राऊत' असायला हवे होते

छत्रपती संभाजीनगर: बैलाला आंघोळ घालण्यासाठी गेलेल्या २ मुलांचा तलावात बुडून मृत्यू

उद्धव ठाकरेंनी भाजपला बुडणारे जहाज म्हणत शिवसैनिकांना दिला संदेश

'पाकिस्तान मानवतेसाठी धोका बनला आहे',असदुद्दीन ओवैसी पुन्हा एकदा शत्रू देशावर टीका केली

पुढील लेख
Show comments