Festival Posters

साडेचार कोटी रुपयांचे सोने फेकले विहरीत

Webdunia
सोमवार, 25 सप्टेंबर 2017 (08:03 IST)
हो असा प्रकार समोर आला आहे नाशिक मध्ये. पिंपळगाव बसवंत येथे एका सोनाराच्या दुकानात चोरट्यांनी चोरी केली होती. मग चोरी केली आणि सोबत सीसीटीव्ही सुद्धा पळवले होते. मात्र कोणाला शंका येवू नये म्हणून एका शेतातील विहरीत पंधरा किलो सोने त्यांनी लपवण्यासाठी टाकून दिले होते. पोलिसांनी इकडे तपास सुरु केला, दुकानातील चोरी कशी झाले हे तपासले. नंतर त्यांनी याठिकाणी असलेल्या सर्व लोकांची तपासणी केली त्यात दुकानातील एक कर्मचारी अचानक सुट्टीवर गेला होता. पोलिसांनी तपास केला. आधीच पुरावे कमी त्यात चोरी झाले तेव्हाचे सर्व सीसी टीव्ही फुटेज चोर घेवून पळाले होते. मात्र पोलिसांनी अखेर छडा लावला आणि हे सर्व चोर पकडले गेले. त्यांनी हे साडेचार कोटी रुपयांचे सोने विहरीत फेकले होते. मग पोलिसांनी विहरीत उतरायला पाणबुड्या बोलवला आणि सर्व सोने बाहेर काढले आहे.

काय आहे प्रकरण :

पिपळगाव बसवंत येथील भरवस्तीतील सराफाच्या दुकानाचे कुलूप तोडून गुरुवारी (दि. २१) रात्रीअज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी करीत दुकानातील तिजोरी बनावट चावीने उघडून सुमारे १५ किलो सोने चोरून नेले होते. हे सोने सुमारे किंमत सुमारे चार कोटी रुपये  आहे.  मुंबई - आग्रा महामार्गावर अशोक चोपडा यांचे श्रीनिवास ज्वेलर्स हे शोरूम आहे सदर दुकान हे दुमजली असूनवरील मजल्यावर मालक स्वत: राहतात.  गुरुवारी रात्री चोरट्यांनी दरवाजा तोडून दुकानात प्रवेश केला व लॉकर बनावट चावीने उघडले. त्यांनी लॉकरमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने घेऊन गेला होता.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Shiv Jayanti 2026 Slogan in Marathi छत्रपती शिवाजी महाराज घोषवाक्य मराठी

Royal Baby Names मुलींसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावरून प्रेरित आधुनिक आणि अर्थपूर्ण नावे

Ramadan 2026 रमजान मध्ये कधीपासून? तारखा, महत्त्व आणि रोजाचे नियम जाणून घ्या

Mangal gochar 2026: कुंभ राशीत मंगळाचा प्रवेश, या राशींचे उजळणार नशीब; तुमच्या राशीवर काय होणार परिणाम?

किडनीच्या रुग्णांनी या भाज्याचे सेवन करू नये, समस्या वाढेल

सर्व पहा

नवीन

पुण्यात १३ वर्षांच्या मुलीवर आईच्या मित्राकडून चालत्या गाडीत दुष्कर्म

देशभरात SIR बाबत एक मोठी घोषणा, आता ती या २३ राज्यांमध्ये करण्यात येणार

रेल्वे सुटण्याच्या १५ मिनिटांपूर्वी बोर्डिंग स्टेशन बदलता येईल; या योजनेमुळे प्रवाशांना दिलासा

ठाणे जिल्ह्यात लाच घेतल्याप्रकरणी ग्रामपंचायत सदस्याला अटक

LIVE: ठाणे 'मोबिलिटी हब' आणि कल्याण 'स्मार्ट सिटी' बनणार

पुढील लेख
Show comments