Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

फडणवीस, राज ठाकरे यांच्या सुरक्षाव्यवस्थेत सरकारकडून कपात

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:09 IST)
विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील भाजप नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत ठाकरे सरकारने कपात केली आहे. भाजपचे माजी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री चंद्रकांत पाटील, राजकुमार बडोले, शोभा फडणवीस, अंबरिष आत्राम, सुधीर मुनगंटीवार, आमदार राम कदम, प्रसाद लाड, माधव भंडारी, मुंबई काँग्रेस माजी अध्यक्ष कृपा शंकर सिंह यांचे पोलिस संरक्षण काढण्यात आले आहे. 
 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे, केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले, माजी मंत्री आशिष शेलार, दीपक केसरकर, माजी राज्यपाल राम नाईक, फडणवीस यांच्या पत्नी अमृता व कन्या दिविजा यांच्या सुरक्षेत कपात करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची झेड सिक्युरिटी काढण्यात आली असून त्यांच्या ताफ्यातील बुलेटप्रुफ गाडीही काढली आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये न्यायालयात सरकारची बाजू मांडनारे वकील उज्ज्वल निकम आणि शुत्रुघ्न सिन्हा यांच्या सुरक्षेत मात्र वाढ केली आहे.
 
विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निम्बाळकर व बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्यासह विद्यमान मंत्री संदीपान भूमरे, अब्दुल सत्तार, दिलीप वळसे-पाटील व सुनिल केदार यांना पोलिस संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर व विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना वाय दर्जाची तर माजी आमदार प्रकाश शेंडगे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा, युवा सेना सचिव वरुण देसाई व राज्य नियोजन आयोगाचे कार्याध्यक्ष राजेश क्षीरसागर यांना एक्स दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

चहा पिण्याची योग्य वेळ कोणती, कोणता चहा कधी प्यावा योग्य वेळ जाणून घ्या

थायरॉईड नियंत्रित करण्यासाठी,हे योगासन करा

मदर्स डे ला स्टेट्सवर आईच्या फोटोसोबत हे कॅप्शन लिहा Mother's Day Status Captions in Marathi

अशात कधीही सूर्याला अर्घ्य देऊ नये

पूजेच्या फुलांपासून घरी बनवा धूप, संपूर्ण घरात दळवळेल सुगंध

सर्व पहा

नवीन

HSC Exam Result :महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार येथे पाहता येईल निकाल

भाजपने इंदिरा गांधींकडून शिकावे, पहलगाम हल्ल्यानंतर संजय राऊत यांनी भाजपला दिला सल्ला

मिलिंद देवरा यांनी उद्धव यांच्यावर निशाणा साधला, शिंदेंना बाळासाहेबांचे खरे वारस म्हटले

LIVE: महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल 5 मे रोजी जाहीर होणार

भारताने बागलिहार धरणातून पाकिस्तानला जाणारा पाण्याचा प्रवाह थांबवला

पुढील लेख
Show comments