Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा वादाच्या भोवऱ्यात; चप्पल घालून शहिदांना श्रद्धांजली वाहिली

Webdunia
रविवार, 27 नोव्हेंबर 2022 (14:05 IST)
Twitter
राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. त्यांच्या शिवाजी महाराजांबद्दलच्या वक्तव्यावरून सुरू झालेला वाद अजून संपला नव्हता तोच ते पुन्हा एकदा वादात सापडले आहेत. 26/11 च्या मुंबई हल्ल्याच्या वर्धापनदिनानिमित्त ते चप्पल घालून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी पोहोचले. या मुद्द्यावरून काँग्रेसने त्यांना कोंडीत पकडले आहे. हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी चप्पल घालून राज्यपालांना काँग्रेसने शहीदांचा अपमान म्हटले आहे. काँग्रेसने त्यांचा एक व्हिडिओही ट्विट केला आहे. 
 
26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईतील ताज हॉटेल आणि इतर काही ठिकाणी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. आज या हल्ल्याला 14 वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस अधिकारी व जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी दक्षिण मुंबईच्या पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनीही शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली, मात्र यावेळी राज्यपालांनी चप्पल घातली होती.
 
राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे. राज्यपालांनी 26/11 च्या हुतात्मांना पायात चपला घालूनच श्रद्धांजली वाहिली. या वर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. ट्विटरवर व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'श्रद्धांजली वाहताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे, महाराष्ट्राची तर आहेच. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि महापुरुषांचा वारंवार अपमान करणारे राज्यपाल हुतात्म्यांचा अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी त्यांना महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते.
<

अभिवादन करताना पादत्राणे बाजूला काढून ठेवणे ही भारताची संस्कृती आहे. महाराष्ट्राची तर आहेच आहे. सातत्याने महाराष्ट्राची संस्कृती व महापुरुषांचा अनादर करणारे राज्यपाल हुतात्म्यांचाही अनादर करत असताना मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीची आठवण करून दिली असती तर बरे झाले असते pic.twitter.com/7Ujwgtuv4x

— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) November 26, 2022 >
 
असे म्हणत त्यांनी राज्यपालांवर  हल्ला बोल केला आहे. 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

उद्धव यांच्या पक्षात फूट? प्रियंका चतुर्वेदी यांनी मोदींचे कौतुक केले, संजय राऊत काय म्हणाले...

'मनमोहन सिंग यांना इशारा देण्यात आला होता, तरीही PMLA तुरुंगात पाठवण्यासाठी एक शस्त्र बनले', शरद पवारांचा मोठा खुलासा

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

पुढील लेख
Show comments