Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

उत्तरेत होरपळ तर दक्षिणेत पावसाचं आगमन, यापुढे मान्सूनची वाटचाल कशी राहील?

Webdunia
रविवार, 2 जून 2024 (16:55 IST)
दक्षिणेत मान्सूनमुळे पाऊस आणि उत्तरेत उष्णतेची लाट, अशी स्थिती सध्या भारतात परिस्थिती दिसून येते आहे. मान्सून कुठे पोहोचला आहे, पुढच्या काही दिवसांसाठी हवामानाचा अंदाज काय सांगतो जाणून घेऊयात.नैऋत्य मोसमी वारे पुढच्या दोन तीन दिवसांत आणखी आगेकूच करतील.
 
हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार अरबी समुद्र, कर्नाटक, रायलसीमा, आंध्र प्रदेशचा किनारी भाग तसंच बंगालच्या उपसागरात आणखी पुढे सरकतील.
 
कर्नाटकात बंगळुरूसह अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली असून, 2 जूननंतर दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे.
 
तीन जूनसाठी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तसंच विदर्भात वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांत वादळी वारा आणि पावसासाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे.
 
तर उत्तर कोकणात ठाणे आणि पालघरमध्ये उष्णतेसाठी यलो अलर्ट आहे. दरम्यान, वायव्य, मध्य आणि पूर्व भारतात उष्णतेच्या लाटेची तीव्रता थोडीशी कमी झाली आहे, तरी इथे पुढचे तीन दिवस उन्हाचा तडाखा जाणवेल, असं हवामान खात्यानं म्हटलं आहे.
 
उष्णतेमुळे उत्तर भारतात हिमालयीन प्रदेशातील जंगलांमध्ये अनेक ठिकाणी वणवे पेटत आहेत. गेल्या दोन तीन दिवसांत हिमाचल प्रदेशात शिमलाच्या आसपास तर जम्मू काश्मिरमध्येही मोठे वणवे पेटले. या आगीवर नियंत्रण मिळण्यासाठी अग्निशमन दलं, वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासन प्रयत्न करत आहे.
 
उन्हाळ्याच्या दिवसांत कडक उष्णतेच्या काळात अशा आगी लागण्याचं प्रमाण वाढतं. यंदा किती दिवस अशी उष्णतेची लाट होती, याची आकडेवारी हवामान विभागानं जाहीर केली आहे.
 
जास्त काळ राहणाऱ्या उष्णतेच्या लाटेकडे गांभीर्यानं लक्ष द्यायला हवं असं तज्ज्ञांना वाटतं.

Published By- Priya Dixit

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments