Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हजारे यांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला, उपोषणावर ठाम

Hazare rejects government's proposal
, सोमवार, 4 फेब्रुवारी 2019 (09:22 IST)
लोकपाल नियुक्तीचा प्रश्न सुटला नाही, तर समाजसेवेसाठी मिळालेला पद्मभूषण पुरस्कार परत करू, असा इशारा ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी दिला आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केंद्र व राज्य सरकारच्या वतीने हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. 
 
अण्णांच्या मागण्यांबाबत राज्य व केंद्र सरकार गंभीर असल्याचे सांगत उपोषण मागे घेण्याची विनंती त्यांनी केली. पण लोकपाल, शेतकऱ्यांचे प्रश्न सुटेपर्यंत उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार हजारे यांनी व्यक्त केला. ते म्हणाले, लोकपाल कायदा होऊन पाच वर्षे झाली तरीही गेल्या पाच वर्षांत लोकपाल नियुक्ती झाली नाही. सर्वोच्च न्यायालयाने तीनदा सरकारला फटकारले. २८ फेब्रुवारीला न्यायालयात सुनावणी असल्याचे सरकार सांगत आहे. मग २८ फेब्रुवारीपर्यंत उपोषण सुरू ठेवतो, असा टोला अण्णांनी लगावला.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अण्णा हजारे यांना पंतप्रधान मोदी यांनी दिले पत्रातून हे उत्तर