suvichar

200 जणांवर मधमाशांनी हल्ला

Webdunia
शुक्रवार, 3 मे 2019 (16:52 IST)
पुण्यातल्या वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या गुंजवणे येथे चार दिवसीय उन्हाळी शिबिरासाठी दाखल झालेल्या 151 शालेय विद्यार्थ्यांसह 200 जणांवर मधमाशांनी हल्ला केला. या हल्ल्यात शिक्षकांसह ७ जण जखमी झाले आहेत. मे ते 5 मे या कालावधीत आयोजित केलेल्या ‘शिवशौर्य साहसी बालसंस्कार शिबीर, शिवतीर्थ राजगड’ या चौथ्या चार दिवसीय उन्हाळी शिबिरात 151 शालेय विद्यार्थी, 34 स्वयंसेवक आणि 15 शिक्षक असे 200 जण सहभागी झाले होते.
 
शिबिराच्या पहिल्याच दिवशी गुंजवणे येथील समाजमंदिरात शिबिरार्थी मुलांची सोय करण्यात आली होती. विद्यार्थी वाहनातून उतरून मंदिरात जाऊन बसत होते. इतक्यात मंदिराशेजारी असणाऱ्या ‘वेळाच्या झाडा’वरील आग्या मोहोळीतील मधमाशांनी अचानक हल्ला चढवला. यानंतर सर्व विद्यार्थी सैरावैरा पळू लागले. विद्यार्थ्यांचा गोंधळ पाहून गुंजवणे आणि चिरमोडी येथील स्थानिक ग्रामस्थांनी मंदिराकडे धाव घेतली. जखमींवर करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

देवाची पूजा करतांना कोणते स्तोत्र आवर्जून म्हणावे?

घरात धार्मिक कार्य करतांना कोणती काळजी घ्यावी?

तुमच्या मोबाईल क्रमांकाचा शेवटचा अंक तुमच्यासाठी शुभ आहे का?

Sanskrit Baby Girl Names चैत्र गौरी निमित्त खास! मुलींसाठी गौरी पासून प्रेरित २० नावे अर्थासहित

Delayed Periods २ महिन्यांपासून मासिक पाळी आली नाही? घाबरू नका, स्वयंपाकघरातील हे ५ पदार्थ करतील कमाल

सर्व पहा

नवीन

Virgin Boy Egg मुलांच्या लघवीत अंडी उकळून तयार कॉफी का पीत आहेत हे लोक? सोशल मीडियावर चर्चांना उधाण

हवामान विभागाने महाराष्ट्रासह १५ राज्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा 'हाय अलर्ट' दिला

मुंबई-गोवा महामार्गावर 'रास्तारोको' आंदोलन; शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा, वाहतुकीवर मोठा परिणाम

विधान परिषदेतून ९ सदस्य निवृत्त होणार; उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे आणि अमोल मिटकरी यांसारख्या मोठ्या नेत्यांना आज निरोप दिला जाणार

पश्चिम आशिया संघर्षावर पंतप्रधान मोदी: ३ लाख हुन अधिक भारतीय सुखरूप परतले

पुढील लेख
Show comments