Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

राज्यात गणेश विसर्जन सोहळ्याला मात्र गालबोट ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला

Webdunia
शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (20:43 IST)
कोरोनामुळे गेली दोन वर्ष सर्वच सण उत्सवांवर निर्बंध घालण्यात आले होते. मात्र लसीकरण आणि कोरोना नियंत्रणात आल्याने यावर्षी कोरोनाचे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत .यामुळे आवडत्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईसह राज्यभरात भक्तांनी समुद्र किनारी, चौपाट्यांवर आणि रस्त्यावर एकच गर्दी केली होती. यावेळी राज्यभऱात वेगवेगळ्या ठिकाणी काही अप्रिय घटनाही घडल्या. ज्यात १९ जणांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे राज्यात गणेश विसर्जन सोहळ्याला मात्र गालबोट लागले.
 
महाराष्ट्र पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार १९ मृतांपैकी १४ जणांचा मृत्यू हा गणपती विसर्जन करताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून झाला आहे. तर चार जणांचा मृत्यू रस्ते अपघातात झाला आहे. ठाण्यात गणपतीची आरती सुरू असतानाच अचानक भलेमोठे झाड गणेश मंडपावर कोसळल्याने आरती वालावरकर या महिलेचा मृत्यू झाला. तर चारजण जखमी झाले आहेत. तसेच यावेळी विसर्जन सोहळ्यात अनेक ठिकाणी कायद्या सुव्यवस्थेचा बोजवाराही उडाल्याचे बघायला मिळाले.
 
वर्धा जिल्ह्यातील सवांगी येथे गणेश विसर्जन करते वेळी पाण्यात बुडून तीन जणांचा मृत्यू झाला. तर येथील देवली या ठिकाणी एका महिलेचा  बुडून मृत्यू झाला आहे. तसेच यवतमाळ जिलह्यातही गणेश विसर्जनावेळी दोन जण बुडाले. तर अहमदनगर जिलह्यातील सुपा आणि बेलवंडी  येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. तर जळगाव येथे अन्य दोघांचा मृत्यू झाला. पुणे येथील ग्रामीण भागात  तीन जणांचा बुडून मृत्यू झाला.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

या तीन परिस्थितीत खोटे बोलणे पाप नाही, प्रेमानंद महाराज काय म्हणाले ते जाणून घ्या

अगस्ती लोप म्हणजे काय? या दरम्यान काय करतात?

माठ ठेवण्याची योग्य दिशा कोणती? व यादिवशी बदलावे पाणी...जाणून घ्या

दररोज मस्कारा लावणे डोळ्यांसाठी हानिकारक ठरू शकते

भारतात कोणत्या ठिकाणी ब्लॅक पँथर दिसतात?, जाणून घ्या रहस्यमय जंगलांबद्दल

सर्व पहा

नवीन

LIVE: एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

एकनाथ शिंदे यांचे वचन - लाडकी बहीण योजना बंद होणार नाही

Monsoon Update 2025: महाराष्ट्रातही वेळेपूर्वी मान्सून, IMD चा अंदाज, 'या' जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट

CJI यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉल मोडला, डीजीपी किंवा मुख्य सचिव आले नाहीत, गवई संतापले

सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये महापालिका निवडणुका! उपमुख्यमंत्री पवार यांनी नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तयारी सुरू करण्याचे निर्देश दिले

पुढील लेख
Show comments