suvichar

मराठवाड्यात शंभर टक्के दुष्काळ, खरीप हंगामात 8 हजारहून अधिक गावांना 50 पैशांपेक्षा कमी आणेवारी

Webdunia
बुधवार, 20 डिसेंबर 2023 (11:44 IST)
यंदा मराठवाड्याला खरीप हंगामात भीषण दुष्काळाचा सामना करावा लागत असून कृषी विभागाने जाहीर केलेल्या सुधारित आणेवारीनुसार मराठवाड्यातील 8 हजार 496 गावांमध्ये सरासरी खरीप आणेवारी केवळ 47.42 टक्के इतकी राहिली आहे. 
 
मान्सूनच्या उशिरा आल्याने पेरणी लांबली आणि नंतर अतिवृष्टीमुळे तसेच पावसाच्या लांबलेल्या खंडामुळे पिकांची वाढ खुंटली. यामुळे खरीप ज्वारी, बाजरी, तूर, कापूस, हरभरा या प्रमुख पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी जमिनीचे धूपण झाले तर काही भागात पावसाच्या अनियमिततेमुळे पिके कोमेजली गेली. शेतकर्‍यांच्या हाती कमी पिक लागले. 
 
नांदेड जिल्ह्यातील 1 हजार 653, धाराशिव जिल्ह्यातील 719, परभणी जिल्ह्यातील 832, जालना जिल्ह्यातील 971, लातू जिल्ह्यातील 952 बीड जिल्ह्यातील 1 हजार 397, हिंगोली जिल्ह्यातील 707 आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 1 हजार 356 गावांचा समावेश असलेल्या या दुष्काळग्रस्त विभागात शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. बर्‍याच ठिकाणी तर 40 टक्क्यांपेक्षाही कमी आणेवारी झाली आहे. 
 
दरवर्षीप्रमाणे 31 ऑक्टोबर रोजी खरीप हंगामाच्या पिकांची सुधारीत आणेवारी जाहीर झाल्यानंतर आता 15 डिसेंबर रोजी अंतिम आणेवारी घोषित करण्यात आली आहे.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

शनिदेवाच्या पूजेत तांब्याची भांडी का वापरू नयेत? नेमकं कारण काय?

जूनमध्ये गुरूचा महापरिवर्तन योग; ३ राशींचे भाग्य उजळणार

हॉटेलमधून मागवण्याऐवजी घरीच बनवा Restaurant Style Mix Veg

रक्तदाब नियंत्रणासाठी वेलची ठरते रामबाण? जाणून घ्या तिचे आश्चर्यकारक फायदे

Career in Polytechnic After 12th: बारावीनंतर या टॉप पॉलिटेक्निक कोर्समध्ये डिप्लोमा कोर्स करा

सर्व पहा

नवीन

१० वर्षांतील सर्वात कमी पावसाची शक्यता, मान्सून मोठा धक्का देणार! IMD ने आपला अंदाज सुधारून खाली आणला

नागपूरमध्ये भाजप नेत्याला धमकी; १ कोटी न दिल्यास कुटुंबीयांना गोळ्या घालण्याची धमकी

LIVE: मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले

मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले, दीड तासाची चर्चा निष्फळ ठरली, प्रसाद लाड अंतरवाली सराटी निघाले

परभणी जिल्ह्यात भीषण रस्ते अपघात, बस-बाईक धडकेत चार जणांचा मृत्यू

पुढील लेख
Show comments