Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन-झिशान सिद्दीकी

Webdunia
शुक्रवार, 23 फेब्रुवारी 2024 (09:17 IST)
Photo- Instagram
मुंबई काँग्रेसचे मोठे नाव असलेले मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकी यांनी पक्षाला रामराम केला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपामध्ये प्रवेश केला. यानंतर आता आणखी एक नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. खुद्द या नेत्यानेच तसे संकेत दिले आहेत.
 
एकीकडे काँग्रेसला गळती लागली असताना दुसरीकडे नेते पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करताना दिसत आहेत. शिवसेनेसारखी दुटप्पी पार्टी आजपर्यंत नाही बघितले. जेव्हा वज्रमुठ सभा झाली तेव्हा उद्धव ठाकरे येऊन म्हणतात की माझ्या हिंदू बांधव आणि भगिनी. बाबरीविषयी विधाने करतात. आम्ही बीकेसीच्या एकाच मंचवर बसलो होतो. लाज वाटते का? अशा पक्षांसोबत काँग्रेस कशी जाऊ शकते? भारत जोडो यात्रेत गेलो तर मला हाकलून दिले.  राहुल गांधी यांची टीम फार वाईट आहे, या शब्दांत काँग्रेस नेते आणि बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांनी पक्षाबाबतची मते तीव्र शब्दांत व्यक्त केली.
 
मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, त्यांचा फोन मी उचलला नाही. त्यांनी आधी आपला मतदारसंघ बघावा. ज्या गोष्टी सुरु आहेत त्यामुळे काँग्रेसची अल्पसंख्यांक मते कमी होतील. त्यांना जर आमची गरज नसेल तर आमचा विचार करायला आम्ही समर्थ आहोत. जर आधी विचारले असते की, काँग्रेसमध्ये राहणार का? तर हो म्हणालो असतो पण आता सांगू शकत नाही की काँग्रेसमध्ये राहीन. काँग्रेसला आमची गरज नाही मग मी पक्षात राहून काय करू? आम्हाला पर्याय आहेत. मी माझ्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय घेईन, असे झिशान सिद्दीकी यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले.

Edited By - Ratnadeep Ranshoor

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Narad Jayanti: नारद जयंती मुहूर्त- पूजा विधी आणि जन्म कथा

Shani Jayanti 2025 : शनी जयंती कधी ? योग्य तारीख, शुभ वेळ, पूजा पद्धत आणि उपाय जाणून घ्या

काय आपण ही सूर्यास्तानंतर दह्याचे सेवन करता? तर नक्की वाचा

उन्हाळ्यात चिकट त्वचेपासून मुक्ती मिळविण्यासाठी हे उपाय मदत करतील

ग्रीन टीमध्ये साखर घालावी की नाही? जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

अमळनेरजवळ मालगाडी रुळावरून घसरली, नंदुरबार-सुरत रेल्वे मार्ग विस्कळीत

LIVE: परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी बसेस स्मार्ट केल्या जातील

पुण्यातील व्यावसायिकाला पाकिस्तानकडून धमकी

इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा

केंद्रीय मंत्री रामदास आठवले म्हणाले, भारताने पाकिस्तानच्या ताब्यातून जम्मू-काश्मीर परत घ्यावे

पुढील लेख
Show comments