Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

'जर 400 पार असता तर हिंदू राष्ट्र बनला असता भारत', BJP नेता राजा सिहांचा मोठा जबाब

T Raja singh
, सोमवार, 17 जून 2024 (10:24 IST)
भाजपाचे फायर ब्रांड नेता टी राजा सिहांनी परत एकदा मोठा जबाब दिला आहे. ते म्हणाले की, जर 400 सीट पार असते तर भारत हिंदू राष्ट्र बनला असता. याशिवाय त्यांनी वक्फ बोर्डचीजमीन परत घेण्याची गोष्ट केली. 
 
ठाण्यातील भिवंडीमध्ये शनिवारी भाजपा नेता टी राजा सिहांनी मोठा जबाब दिला. टी राजा सिहांनी भिवंडी तालुका मधील पडघा मध्ये संत सम्मेलन आणि हिंदू धर्म सभेच्या आयोजनमध्ये सहभागी होण्यासाठी पोहचले होते. या सभेचे मुख्य मार्गदर्शक रूपामध्ये तेलंगणाचे आमदार टी राजा सिंह यांना आमंत्रित केले होते. तर या कार्यक्रम मध्ये आपल्या भाषणादरम्यान भाजपचे फायर ब्रांड आमदार राजा सिंह म्हणाले की, वक्फ बोर्ड अधिनियमला निरस्त केले पाहिजे याशिवाय ते म्हणाले की, लव जिहाद विरोधी अधिनियम ला मंजुरी देण्यात यावी आणि गोहत्या वर प्रतिबंध लागू करण्यात यावा.
 
महाराष्ट्रामध्ये मठ आणि मंदिर सुरक्षित नाही-
टी राजा सिंह पुढे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये मठ आणि मंदिर सुरक्षित नाही. छत्रपति शिवाजी महाराजांनी 370 किल्ले जिंकले होते, पण दुर्भाग्यवष विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या 100 किल्यांवर मस्जिद आणि दरगाहबनले आहे. मी  सीएम शिंदे यांना किल्यांवरील अतिक्रमण काढण्यासाठी अनुरोध केला आहे. सोबतच टी राजा सिंह म्हणाले की, जर संपन्न लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने 400 चा आकडा पार केला असता तर, तर भारत हिंदू राष्ट्र बनले असते. ते म्हणाले की, महाराष्ट्रमध्ये 1 लाख एकर जमीन वक्फ बोर्ड जवळ आहे. भारतामध्ये 10 लाख एकर जमीन वक्फ बोर्ड जवळ आहे. मी पंतप्रधान आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना वक्फ बोर्ड एक्ट बंद करण्याची अपील केली आहे. वक्फ बोर्डची जमिनीवर हिंदूंसाठी रुग्णालय, खेळ खेळण्यासाठी मैदान, कॉलेज आणि घर बनवा. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

महाराष्ट्रातील सरकारी रुग्णालयात प्रत्येक आजारावर होईल मोफत उपचार, मिळेल चांगली आरोग्य सेवा