Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास आम्ही ५ वर्ष मोफत वीज देऊ : बावनकुळे

Webdunia
बुधवार, 16 मार्च 2022 (15:21 IST)
राज्यात कृषीपंप वीज ग्राहकांची वीज न कापण्याच्या निर्णय ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतला. महाविकास आघाडी सरकार अस्तित्वात असेपर्यंत शेतकर्‍यांची वीज कापणार नाही, असा निर्णय ठाकपे सरकारने घ्यावा, अशी मागणी विधान परिषदेचे सदस्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. आमचे देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार आल्यास आम्ही ५ वर्ष मोफत वीज देऊ असेही बावनकुळे यांनी सभागृहात सांगितले. अर्थसंकल्पावर आयोजित चर्चत ते बोलत होते.
 
भाजपचे ५ वर्षे सरकार होते. आम्ही ४५ लाख शेतकऱ्यांना २८ हजार कोटींची वीज मोफत दिली असे बावनकुळे यांनी सांगितले. पण या काळात शेतकऱ्यांची वीज कधीही कापली नाही. शेतकरी हा जीडीपीला हातभार लावणारा आहे. त्यामुळे शेतकर्‍यांची वीज मविआने कापू नये अशी मागणी बावनकुळे यांनी केली. राज्यातील शेतकऱ्यांची वीज न कापल्यास राज्याची वित्तीय तूट भरून निघालयाही मदत होईल.
 
आमच्या काळात महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या कंपन्या ४५०० कोटी रुपयांच्या फायद्यात होत्या. पण सध्या कंपन्या अचणीत आल्या आहेत. राज्यात ५ हजार विद्युत सहाय्यकांची भरती प्रक्रिया अद्यापही पूर्ण झाली नसल्याची बाब त्यांनी सभागृहात सांगितली. या भरतीसाठी दीड लाख अर्ज आले होते. पण अद्यापही ही प्रक्रिया अपूर्ण असल्याचे त्यांनी सांगितले.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पितृ पक्ष 2024: पितृपक्षात श्राद्ध, तर्पण किंवा पिंडदान करण्यासाठी लागणारे साहित्य आणि पूजा विधी जाणून घ्या

पितृपक्षात मृत नातेवाईक स्वप्नांच्या माध्यमातून संदेश देतात, अशी स्वप्ने पडली तर दुर्लक्ष करू नका

लाल रंग सकारात्मक की नकारात्मक? आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व जाणून घ्या

अविवाहित आणि आकस्मिक मृत्यू झालेल्या पूर्वजांसाठी तर्पणचे नियम जाणून घ्या

Vastu Tips: तुमचे भाग्य बदलू शकतात वास्तुशास्त्राचे हे 5 उपाय

सर्व पहा

नवीन

सोडा कारखान्याच्या पाइपलाइनमधून क्लोरीन गॅसची गळती

IND U19 vs AUS U19: भारतीय 19 वर्षांखालील संघा कडून ऑस्ट्रेलियाचा 7 गडी राखून पराभव

कमला हॅरिसचे ट्रम्प यांना आणखी एका चर्चेचे आव्हान

कर्मवीर भाऊराव पाटील जयंती 2024 :थोर शिक्षणतज्ञ, समाजसुधारक आणि समाजसेवक कर्मवीर भाऊराव पाटील माहिती

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आतिशी यांनी केजरीवालांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले

पुढील लेख
Show comments